मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेसाठी बागेश्वर धामची (Bageshwar Dham) अटल भक्ती जीवघेणी ठरली. इकडे कांचनपूर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पतिने बागेश्वर धामच्या प्रवचन कार्यक्रमाला नाही नेलं म्हणून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पल्लवी चौधरी (वय,27) असं या मृत महिलेचं नाव असून तिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
[read_also content=”https://www.navarashtra.com/latest-news/3000-corona-patients-found-in-the-country-every-day-who-advice-to-take-boosters-dose-nrps-380136.html चिंताजनक! देशात रोज कोरोनाच्या 3000 रुग्णांची नोंंद; मास्क घाला, बूस्टर्स डोस घ्या, WHO चा सल्ला”]
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, संदीप चौधरी हे पत्नी पल्लवी, दोन मुले आणि आईसोबत राहत होते. वृद्ध आईला गंभीर आजार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही. संदीप कसा तरी कुटुंब चालवतो. तो दोन मुलांना शिकवत आहे आणि त्याच्या आजारी आईवर उपचार करत आहे. संदीपची पत्नी पल्लवी चौधरी या दररोज बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन ऐकत असत आणि घरातील अडचणी दूर करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री जे काही सांगतात त्यावर विश्वास ठेवत असत. 27 मार्च रोजी पल्लवीने तिच्या पतीकडे पानगर येथे होणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या भागवत कथेला जावे, असा आग्रह धरला, परंतु त्याच दिवशी संदीपने तिला तिच्या आजारी आईवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात नेले आणि दुसरीकडे, घरी प्रवचनासाठी जाण्यासाठी थांबलेल्या पल्लवीने रागाच्या भरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
संदीपने सांगितले की, घटनेनंतर लगेचच शेजाऱ्यांसह घराचा दरवाजा तोडला आणि पल्लवी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. एसआय अनिल कुमार यांनी सांगितले की, ही घटना बाबांवरील अंध भक्तीचे परिणाम आहे. लोक बेकारी, रोगराई आणि आर्थिक समस्यांचे समाधान बाबांच्या चमत्कारात शोधत आहेत. हे केवळ पल्लवीचेच नाही, तर समाजात लाखो-करोडो त्रस्त लोक आहेत, आता बाबांच्या चमत्काराने त्यांच्या समस्या संपतील, असे त्यांना वाटते. पल्लवीलाही बाबांच्या दरबारात जाता आले नाही, तेव्हा तिने आत्महत्या केली.