संग्रहित फोटो
शमिना व समीर (नावे बदललेली) यांचा विवाह २०१८ मध्ये झाला. त्यांना मुलगी झाली. राजेश हे नोकरीनिमित्त वारंवार दुबई येथे जात. दरम्यान, सासऱ्यांकडून शारीरिक छळाचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत शमिनाने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास सुरू झाल्याचा दावा तिने केला.
समीर व त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कविताने २०२० मध्ये मुलीला घेऊन माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. नंतर राजेश यांनी मुलीचा ताबा मिळावा यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावत वडिलांना केवळ भेटण्याची परवानगी दिली.
कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला समीर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. कविताच्या बाजूने अॅड. अनघा काळे यांनी युक्तिवाद करत कागदोपत्री पुरावे सादर केले. समीर हे परदेशात नोकरी करतात. त्यांच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळण्यासाठी शमिनाने स्वतंत्र अर्ज दाखल केल्याची माहिती न्यायालयास देण्यात आली. तसेच सासऱ्यांच्या विरोधात तक्रार प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले.
हे सुद्धा वाचा : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?
‘मुलीचे हित सर्वांत महत्त्वाचे’
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुरावे ऐकून न्यायालयाने मुलीच्या हिताला प्राधान्य दिले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मुलीचे संगोपन आईकडून व्यवस्थितपणे होत असल्याचे निरीक्षण नोंदविले. अशा परिस्थितीत मुलीचा ताबा वडिलांकडे किंवा त्यांच्या नातेवाइकांकडे देणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने वडिलांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने या पूर्वीप्रमाणेच वडिलांना भेटीचा अधिकार कायम ठेवला असून, मुलीच्या सर्वांगीण हिताचे रक्षण होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमा शेत परिसरात शेतातील घास कापल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून तरुणाला जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दत्तात्रय बाळासाहेब कापरे, सारिका दत्तात्रय कापरे व ओम दत्तात्रय कापरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






