का ठेवण्यात आले होते बंद?
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, आई-मुलीला एका खोलीत बंद ठेवण्यात आले होते, कारण त्या शेजाऱ्यांवर दगडफेक करून त्यांना त्रास देत होत्या. ही धक्कादायक घटना लातूर शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पखरसांगवी गावाजवळील रत्नापूर नगर येथे घडली. दोघींची मंगळवारी, ३ फेब्रुवारी रोजी सुटका करण्यात आली.
Mumbai Crime: विकृतीचा कळस! कांदिवलीत मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; कठोर कारवाईची मागणी
कशी करण्यात आली सुटका?
सामाजिक कार्यकर्ता व्यंकट पन्हाळे यांना आठ दिवसांपूर्वी याची माहिती मिळाली होती. खात्री केल्यानंतर त्यांनी वंचित मुलांसाठी असलेल्या ‘माझं घर’ या आश्रयगृहाचे संस्थापक शरद झारे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांनी सोमवारी पोलीस अधीक्षक (एसपी) अमोल तांबे यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. एसपी अमोल तांबे यांनी मानव तस्करी विरोधी कक्षाला (एएचटीसी) तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. सामाजिक कार्यकर्त्यांसोबत पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ११ वाजता मायलेकींची सुटका करण्यात आली.
लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?
लातूर जिल्ह्यातील खोपेगाव शिवारात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या मुलानेच आपल्या आयकर अधिकारी वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
कारण काय?
वडील आणि मुलामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर भांडणात झाले. संतापाच्या भरात मुलाने चाकूने वडिलांवर वार केला. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला आहे. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Jalgaon Crime: जळगाव हादरलं! पद्मालय जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह
Ans: लातूर शहराजवळील रत्नापूर नगर, पखरसांगवी परिसरात.
Ans: सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिस व एएचटीसी पथकाने कारवाई करून सुटका केली.
Ans: त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून शेजाऱ्यांना त्रास देत असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.






