भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; समर्थकही जखमी, कारण काय तर…
काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव अश्विनी रावताले असे आहे. ती पानसेमल तालुक्यातील गोंगवाडा गावची रहिवासी आहे. ती निवाली येथील एकलव्य आदर्श निवासी शासकीय वसतिगृहात नववीत शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री अश्विनी ही वसतिगृहातील बाथरूममध्ये कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होती. तेव्हा काही वरिष्ठ विद्यार्थिनींनी तिला पाहिले. त्यांनी ही बाब व्यवस्थापकाकडे सांगण्याची धमकी दिल्याचे सांगितले जाते. यामुळे अश्विनी घाबरली. तिने आपला मोबाइल फोन फेकून दिला आणि खोलीत जाण्याऐवजी जवळच असलेल्या स्टोअर रूममध्ये जाऊन तिने गळफास घेत आत्महत्या केली.
ही घटना कशी उघडकीस आली
अश्विनी ही जेवण करण्यासाठी आली नाही म्हणून तिच्या रूममेटने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी ती स्टोअर रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तातडीने व्यवस्थापकाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला.
पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून त्याची तपासणी सुरु आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यास नकार दिला आहे. त्यांनी वसतिगृह परिसरात जोरदार आंदोलन केले. वसतिगृह व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
Ans: मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील निवाली येथील एकलव्य आदर्श निवासी वसतिगृहात.
Ans: मोबाईलवर बोलल्यामुळे तक्रार होईल या भीतीने आलेला मानसिक दबाव.
Ans: पोलिस तपास सुरू असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.






