काय घडलं नेमकं?
नंदुरबार जिल्ह्यातील कहाटुळ येथील एक महिला गेल्या २१ दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी तिची शोध घेतली मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस आणि कुटुंबीय गेल्या तीन आठवड्यांपासून तिचा शोध घेत होते. २१ दिवसानंतर तिच्याच शेताच्या बांधावर तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मद्यधुंद चालकांना पुणे पोलिसांचा दणका! एकाच दिवसात ४५५ चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, पोलीस ही महिला कुठे होती आणि तिचा मृत्यू नेमका कधी आणि कसा झाला, या प्रश्नांचे गूढ अद्याप कायम आहे. पुढील तपास शहादा पोलीस करत आहे.
नागरिकांची मागणी काय?
महिलेचा मृतदेह ज्या स्थितीत सापडला, त्यावरून तिचा घातपात झाला असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच समाजातील बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना तत्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
पतीच्या अफेअरला केला विरोध, विवाहबाह्य संबंधातून छळ; नंदुरबारमध्ये 29 वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत
नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २९ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव भाग्यश्री गौरव चौधरी (३५) असे आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केला म्हणून गौरवकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. यातूनच तिने आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral
Ans: नंदुरबार जिल्ह्यातील कहाटुळ (शहादा तालुका) येथे.
Ans: तिच्याच गावातील शेताच्या बांधावर.
Ans: पोस्टमार्टेमनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल; शहादा पोलिस तपास करत आहेत.






