फोटो सौजन्य - ANI सोशल मिडिया
India vs England : २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना होणार आहे. दोन्ही संघ ५ मार्च २०२६ रोजी एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघ आज २०२६ च्या T20 विश्वचषकातील सेमीफायनलचा दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. कालच्या पहिल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी पराभूत करुन फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.
मुंबईतील हा सामना जिंकून टीम इंडिया अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याचे लक्ष्य ठेवेल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया ट्रॉफी जिंकण्यासाठी फेव्हरिट वाटत होती. आता, बीसीसीआयने या सामन्यापूर्वी एक मोठे विधान जारी केले आहे. उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आता टीम इंडियाच्या विजयाचा दावा केला आहे.
होळी साजरी केल्यानंतर, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआयला मुलाखत दिली. त्यांना सेमीफायनल सामन्याबद्दल विचारण्यात आले. त्यांनी अचूक उत्तर देत टीम इंडियावर विश्वास व्यक्त केला आणि भारतीय संघ निश्चितच अंतिम फेरीत पोहोचेल असा दावा केला. राजीव शुक्ला म्हणाले, “भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल मुंबईत खेळवण्यात येईल. मला विश्वास आहे की टीम इंडिया जिंकेल आणि अंतिम फेरीत पोहोचेल.”
#WATCH | Delhi: Ahead of India’s #ICCT20WorldCup semi-final match against England tomorrow, BCCI vice president Rajeev Shukla says, “…I am very confident that Team India will win and enter the final.” pic.twitter.com/Gs80FsLNCD — ANI (@ANI) March 4, 2026
बाद फेरीच्या सामन्यांमध्ये खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावते. संघ संयोजन सहसा त्यानुसार ठरवले जाते. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे, जिथे गवत आहे. यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते. सामन्यापूर्वी खेळपट्टीवर हार्ड रोलर वापरला जाईल, ज्यामुळे फलंदाजांना मोठा फायदा होईल, असे वृत्त आहे.
टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करेल का?
भारतीय संघाने सलग दोन विजय मिळवले आहेत आणि त्यांना त्यांचे परिपूर्ण संयोजन सापडले आहे असे दिसते. स्टार फलंदाज अभिषेक शर्मा खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्या स्थानाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. तथापि, भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी अभिषेक खेळेल याची पुष्टी केली आहे. परिणामी, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता नाही.






