केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांसाठी वाढवली बक्षिसाची रक्कम (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते आणि वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. नवनवीन प्रकल्प हाती घेत त्यांनी वाहतूकीचा दर्जा सुधरवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये केंद्र सरकारने अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले जात आहे.
रस्त्यांवर अपघात झाल्यानंतर अनेकदा ज्याने अपघात केला आहे तो चालक कारवाईच्या भीतीने पळून जातात. तर इतर वाहन चालक वेळ जाईल म्हणून निघून जातात. तर काहीजण पोलिसांना देखील अपघाताची माहिती देत नाहीत. पोलीस आपलीच कसून चौकशी करत बसतील आणि मनःस्ताप सहन करावा लागेल, पोलीस आपल्यालाच या अपघातात अडकवतील या भीतीने लोक अपघातग्रस्तांची मदत करणं टाळतात. यामुळे अपघातामध्ये लवकर मदत न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण देखील जातात. यामुळे केंद्रीय सरकारने अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या लोकांसाठी आता केंद्र सरकारने तिजोरी उघडली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. गडकरी म्हणाले की, “रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात नेणाऱ्या लोकांसाठी सरकार बक्षिसाची रक्कम २५,००० रुपये करणार आहे. सध्या ही रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच बक्षिसाची रक्कम पाच पटींनी वाढवली जाणार आहे”. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या एका क्लिकवर
रस्ते सुरक्षेबाबत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्याबरोबर एका टीव्हीवरील कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “मी रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आत्ता देखील अशा प्रकारचं बक्षीस दिलं जात आहे. परंतु, त्या बक्षिसाची रक्कम खूप कमी आहे.अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला ५,००० रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. मात्र मी बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यावर कोणीही एखादा अपघात पाहिला तर एका तासाच्या आत अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस दिलं जाईल.