Aamir Khan (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
आत्ताची मोठी बातमी…
अभिनेता सलमान खाननंतर आता अमिर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने पोस्ट
सुरक्षा यंत्रणांचेही लक्ष
Bishnoi Gang Viral Post : बॉलिवूड अभिनेतचा आमिर खान आता नव्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने तिसर लग्न केलं. आमिर खानने गौरी स्पिरिटशी लग्न केले; हे तिचे तिसरे लग्न केले. गौरी स्पिरिटशी ही हिंदू असल्याने आता नवीन वाद निर्माण झाला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही पोस्ट आणि एका कथित ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये आमिर खानला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला असून, ही धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने दिली गेल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे मनोरंजन क्षेत्रासोबतच सुरक्षा यंत्रणांचेही लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे.
आमिर खानवर गंभीर आरोप
गेल्या काही महिन्यांपासून सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई गँग यांच्याशी संबंधित बातम्या सातत्याने समोर येत होत्या. आता त्याच पार्श्वभूमीवर आमिर खानचे नाव समोर आले आणि त्याने अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र, सध्या समोर आलेली माहिती ही सोशल मीडियावरील दाव्यांवर आधारित असून, अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नाही. व्हायरल पोस्टमध्ये स्वतःला बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने आमिर खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्यात काही धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांचा उल्लेख करत अभिनेत्याला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते. यासोबतच एक कथित ऑडिओ क्लिपही मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. त्यामुळे अनेकांनी या दाव्यांच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोणतीही अधिकृत पडताळणी नाही.
या पोस्टमध्ये केवळ आमिर खानच Aamir Khan नव्हे, तर राजस्थानातील एका मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी भाषा वापरण्यात आली असून काही राजकीय व्यक्तींवरही आरोप करण्यात आले आहेत. मात्र, या सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे कोणतीही अधिकृत पडताळणी झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर मुंबई पोलिसांसह सायबर सेलने तपास सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल पोस्ट नेमकी कुठून आली, ती कोणी तयार केली आणि त्यामागे खरोखर कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे. तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या कथित ऑडिओ क्लिपचीही तांत्रिक तपासणी केली जात आहे.
काय लिहिलयं या पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, जय श्री राम जय सिता राम मैं Aarzoo Bishnoi और Tyson Bishnoi (Lawrence Bishnoi Group) ये जो हमारी संस्कृति के ख़िलाफ़ हमारे देश में लव जिहाद के नाम पर Aamir Khaan जैसे लोग इसको बढ़ावा दे रहे हैं। हम इस कृत्ये को बर्दाश्त नहीं करेगे और इसका जवाब बहुत जल्द इसको दे दिया जाएगा। ये चीज हमारे सनातन धर्म में और देश के खिलाफ है। हमारा हमारे भाई बहनो और देश वासियों से वादा है की जो भी इस घटिया हरकतों को बढ़ावा देगा उसको हम अपने तरीके से जवाब देंगे। ये जो स्टारडम के नाम पर इस चीज को बढ़ावा दे रहे है इनकी हम साँसे दबा लेंगे और साथ ही में ये जो श्री गंगानगर राजस्थान में ग्रहण कृत्य एक मासूम बच्ची के साथ हुआ है। इसमें प्रशासन ने बहुत अच्छा कम किया लेकिन कुछ राजनीतिक लोग इनमें से कुछ दरिंदों को बचा रहे है। हमारी पहली और आख़िरी चेतावनी है। जो कोई भी उस मासूम बच्ची के साथ जो हुआ उसमे एक परसेंट भी शामिल है और क़ानून से बच गया उसको तो हम सज्जा देंगे ही पर जो नेता इनको बचाने की कोशिश कर रहे हैं तुरंत इसमें दखल अंदाजी देनी बंद करदो नहीं तो तुम्हारा भी वही हाल करेंगे जो इनका होने वाला है। थोड़ी इंसानियत दिखाओ। हमारे जो 2 भाई शहीद हुए है parvesh और himanshu आप हमेशा हमारे दिल में रहोगे और हम तुम्हारा बलिदान ज़ाया नहीं जाने देंगे। दुश्मनों को मुंह तोड़ जवाब देंगे।
भगवान आप दोनों भाइयो की आत्मा को शांति दे।
Amir Khan Gauri Sprat ची लव्ह स्टोरी माहीत आहे का? 25 वर्ष जुनं प्रेम …
दरम्यान, आमिर खान किंवा त्याच्या टीमकडून या प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे या चर्चांवर त्यांनी मौन बाळगले आहे. त्यांच्या चाहत्यांमध्येही या प्रकरणाबाबत उत्सुकता असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा केली जात आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अशा प्रकारच्या पोस्ट काही मिनिटांत लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. मात्र, प्रत्येक व्हायरल संदेश खरा असेलच असे नाही. अनेकदा खोटी माहिती, बनावट ऑडिओ किंवा दिशाभूल करणारे दावेही मोठ्या प्रमाणात पसरवले जातात. त्यामुळे कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची खात्री करणे आवश्यक आहे.
अनेक दावे आणि चर्चा सुरू
सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांनाही अफवांपासून दूर राहण्याचे आणि अपुष्ट माहिती पुढे पाठवू नये, असे आवाहन केले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य ठरणार नाही. संबंधित एजन्सी सर्व डिजिटल पुरावे तपासत असून, सत्य समोर आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. सध्या या प्रकरणात अनेक दावे आणि चर्चा सुरू असल्या तरी अधिकृतरीत्या कोणतीही गोष्ट सिद्ध झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट किंवा ऑडिओ क्लिपला अंतिम सत्य मानणे योग्य ठरणार नाही. तपास यंत्रणांचा अहवाल समोर आल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचे वास्तव स्पष्ट होईल. तोपर्यंत अफवांपेक्षा अधिकृत माहितीलाच महत्त्व देणे गरजेचे आहे.
दोन लग्न, दोन घटस्फोट! Aamir Khanच्या आयुष्यात नेमकं काय घडलं …






