फोटो सौजन्य - Social Media
Shabana Azmi: CJP आंदोलनात शबाना आझमींची बिघडली तब्येत; अश्रुधुरामुळे अस्थमाचा अटॅक आल्याचा आरोप
भक्ती, अध्यात्म आणि कीर्तन परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम आषाढी एकादशीच्या निमित्ताने अधिक खास ठरणार आहे. कीर्तन, अभंग, भारूड आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरातून महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे दर्शन घडवले जाणार आहे. संतविचारांचा संदेश आणि भक्तीची ऊर्जा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.
या विशेष पर्वात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सोपान सानप, संगीता चोपडे, अविनाश भारती, प्रकाश साठे, भानुदास बैरागी आणि गौरीताई सांगळे आपल्या प्रभावी निरूपणातून भक्तिरसाची उधळण करणार आहेत. संतांच्या अभंगांचे सादरीकरण, ओजस्वी वाणीतील कीर्तन आणि अध्यात्मिक विचारांमुळे प्रेक्षकांना भक्तीच्या विश्वात रमण्याची संधी मिळणार आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत नामदेव यांच्या शिकवणीतील हरिनामाचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि जीवनमूल्ये यांची प्रेरणादायी मांडणी या कार्यक्रमात अनुभवायला मिळेल. मनाला शांतता देणारे विचार, भक्तिभावाने भारलेले वातावरण आणि संतवाणीचा अमृतवर्षाव यामुळे प्रत्येक घरात भक्तीचा उत्सव साजरा होणार आहे.
‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’ हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार सायंकाळी ६ वाजता फक्त झी टॉकीजवर प्रसारित होतो. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलनामाचा गजर आणि संतपरंपरेचा आध्यात्मिक वारसा अनुभवण्याची ही पर्वणी भाविकांनी नक्कीच अनुभवावी.
नात्यांतील दडलेलं सत्य उलगडणार! ‘काटकोन त्रिकोण’ नाटकाची रंगभूमीवर दमदार एन्ट्री
आषाढ शुद्ध एकादशीला साजरी केली जाणारी आषाढी एकादशी ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक सणांपैकी एक आहे. या दिवशी भगवान विठ्ठल आणि रुक्मिणीची भक्तिभावाने पूजा केली जाते. पंढरपूर येथे लाखो वारकरी दिंड्या आणि पालख्यांसह विठुरायाच्या दर्शनासाठी एकत्र येतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसह अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात. उपवास, हरिनाम संकीर्तन, भजन, कीर्तन आणि अभंग गायन यांना या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात आषाढी एकादशी श्रद्धा, भक्ती, समता आणि सेवाभावाचे प्रतीक मानली जाते. या दिवशी विठ्ठलाच्या नामस्मरणाने मनाला शांती आणि आध्यात्मिक समाधान मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.






