'अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच...'; भास्करराव जाधवांचा खळबळजनक दावा
या वक्तव्यामुळे त्या अपघाताबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, राजकीय वर्तुळात या दाव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, जाधव यांनी या दाव्याबाबत अधिक तपशील किंवा कोणतेही पुरावे सार्वजनिकरीत्या मांडले नाहीत.
यावेळी बोलताना भास्करराव जाधव यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्यशैलीचेही भरभरून कौतुक केले. “अजितदादा म्हणजे कठोर शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि निर्मळ मनाचा राजा माणूस आहेत. त्यांनी प्रशासनात आणि राजकारणात काम करण्याची वेगळी कार्यपद्धती निर्माण केली आहे,” असे ते म्हणाले. तसेच, अजित पवार यांची निर्णयक्षमता, कामातील वेग आणि प्रशासनावरील पकड यांचा उल्लेख करत अनेक कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्थान असल्याचेही जाधव यांनी सांगितले. दरम्यान, “अपघात नव्हे, घातपात” या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या वक्तव्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीमध्ये एका चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. त्यावेळी रोहित पवार यांनी या अपघाताला एक मोठे षडयंत्र म्हटले असून, या प्रकरणाची सखोल आंतरराष्ट्रीय किंवा सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.






