मुसळधार पावसात मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा; 'वी' स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा
Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
मुंबईत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि संपूर्ण मुंबईतील जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. हजारो मुंबईकर जागोजागी अडकून पडले. पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या मुंबईकरांना अगदी गरजेच्या वेळी दिलासा देण्यासाठी, देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी ‘वी’ पुढे सरसावली आहे. ‘वी’ने, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील आपल्या रिटेल स्टोअर्सचे दरवाजे नागरिकांसाठी खुले केले आहेत.
‘वी’ची स्टोअर्स नागरिकांसाठी बनली आहेत एक सुरक्षित आणि हक्काची जागा! पावसात अडकलेली कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या ‘वी’ स्टोर मध्ये जाऊन, त्यांचा पुढील प्रवास सुरक्षित होईपर्यंत आश्रय घेऊ शकते. ही सुविधा तातडीने सुरू करण्यात आली आहे. हवामान सुधारेपर्यंत नागरिक ‘वी’ स्टोअरमध्ये थांबून पावसापासून स्वतःचा बचाव करू शकतात, आपले मोबाईल फोन चार्ज करू शकतात. मुसळधार पावसातही सुरक्षित व आरामदायी वातावरणात थांबून स्वतःला रिफ्रेश करण्याची ही सोय मुंबईकरांसाठी खूप मोठा दिलासा आहे.
मुंबईत ‘वी’ ची रिटेल स्टोअर्स संपूर्ण शहरभर जागोजागी आहेत. अचानक मुसळधार पाऊस पडला तरी ‘मदत अगदी जवळ उपलब्ध आहे’ असा विश्वास मुंबईकरांना देण्याचा अनोखा उपक्रम ‘वी’ राबवत आहे. पावसात अडकलेल्यांना जिथे आसरा घेता येईल असे सर्वात जवळचे ‘वी’ स्टोर शोधण्यासाठी मुंबईकर त्यांच्या सध्याच्या लोकेशनच्या आधारे गूगल मॅप्सचा वापर करू शकतात. ‘ग्राहकांना सर्वप्रथम प्राधान्य’ या आपल्या विचारांमधूनच ‘वी’ ने हा उपक्रम चालवला आहे.
कठीण काळात आपल्या स्टोर्सच्या माध्यमातून ग्राहकांना मदत उपलब्ध करवून देण्याचा ‘वी’ चा हा प्रयत्न, केवळ नेटवर्क कनेक्टिव्हिटीपुरते मर्यादित न राहता, ग्राहक आणि स्थानिक लोकांशी आपले नाते अधिकाधिक घट्ट करण्याप्रती ‘वी’ची बांधिलकी दर्शवतो. टेलिकॉम कंपनी वी ने घेतलेला हा निर्णय मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण मुसळधार पावसात वाहतूक ठप्प झाल्यास मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच आश्रय देखील शोधावा लागतो. अशा मुंबईकरांना आता ‘वी’ चे स्टोअर्स मदत करणार आहेत.






