फोटो सौजन्य - Social Media
काही दिवसांपूर्वी मालिकेत समरची जुनी मैत्रीण किमयाची एण्ट्री झाल्याने कथानकात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. प्रेक्षकांना हा ट्विस्ट आवडतही होता. मात्र आता अभिनेत्री Purva Gokhale हिने अवघ्या १५ दिवसांत मालिकेला निरोप दिला आहे. मालिकेच्या कथानकात मल्लिका सतत समर आणि स्वानंदी यांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्याचदरम्यान समरची मैत्रीण किमया त्यांच्या घरी राहायला येणार असल्याचं समजताच कथेला वेगळं वळण मिळालं. किमयाची भूमिका साकारण्यासाठी पूर्वा गोखलेची मालिकेत एण्ट्री झाली होती आणि तिच्या भूमिकेने कमी वेळातच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. दरम्यान, पूर्वा गोखलेने तिच्या प्रेक्षकांना
पूर्वाने सोशल मीडियावर सहकलाकारांसोबतचे मजेशीर क्षण आणि निरोप समारंभाचे फोटो शेअर करत मालिकेतून बाहेर पडत असल्याची माहिती दिली. “किमया वादळासारखी आली आणि शांतपणे निघून गेली. या १५ दिवसांच्या प्रवासात मला भरभरून प्रेम, आदर आणि आपुलकी मिळाली,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले. तसेच सेटवरील सहकलाकारांमुळे घरासारखं वातावरण मिळाल्याचंही तिने नमूद केलं.
पूर्वाच्या पोस्टवर Subodh Bhave याने “१८ तास” आणि हार्ट इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली, तर Tejashri Pradhan हिने “मलाही तुझी आठवण येईल” असे म्हटले. नेटकऱ्यांनीही किमयाच्या भूमिकेचे कौतुक करत तिचा शेवटचा सीन विशेष आवडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.






