फोटो सौजन्य - Social Media
Dementia आजराने गेली होती स्मृती!
कवी बशीर काही काळापासून Dementia या आजाराने त्रस्त होते. हा आजार म्हणजे स्मृतीभंश! अगदी कवींना त्यांनी स्वतः लिहलेल्या ओळीही लक्षात नव्हत्या. या काळात त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांनी लिहलेल्या कविता ऐकवल्या आणि त्यांना त्यांच्या लेखणीशी जोडून ठेवलं.
सिनेक्षेत्रातून आल्या प्रतिक्रिया!
कवींच्या जाण्याची बातमी येताच सिनेक्षेत्रातून श्रद्धांजली वाहिल्या जाऊ लागल्या. संगीत सृष्टीतील नामवंत गीतकारांनी बशीर यांना आदरांजली वाहिली. गीतकार जावेद अख्तर यांनीही पोस्ट केली आहे. उर्दूमध्ये लिहीत यांनी कवींना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “आज आमची उर्दू आणखीन गरीब झाली. बशीर बद्र सारखे थोर कवी आपल्याला सोडून निघून गेले. पण हा कवी आणि त्यांच्या कविता आमच्या नेहमी लक्षात राहतील.”
आपलं आयुष्य साहित्यासाठी अर्पण केलेल्या आणि उर्दू तसेच मराठी लेखनात आपले योगदान देणारे कवी बशीर बद्र आपल्या लेखणीने नेहमीच जिंवत राहतील आणि प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील.






