फोटो सौजन्य - Social Media
कथेत अण्णा गाव सोडल्यानंतर त्याच्या जागी नाना नावाचा अधिक धूर्त आणि प्रभावशाली प्रतिस्पर्धी मैदानात उतरतो. तो केवळ राजकारण करत नाही, तर गावात खोट्या अफवा पसरवून आणि नात्यांमध्ये फूट पाडून अवलीविरोधात वातावरण तयार करतो. खोटे आरोप, कौटुंबिक संघर्ष आणि बालविवाहाच्या प्रकरणामुळे अवलीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होतो. मात्र, प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात ती आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता लोकांच्या विश्वासासाठी लढताना दिसते.
‘सौभाग्यवती सरपंच २’मध्ये सत्ता, स्वार्थ आणि अफवांच्या राजकारणाविरुद्ध सत्य, धैर्य आणि लोकहिताची लढाई अधिक प्रभावीपणे उलगडली जाणार आहे. अवली पुन्हा एकदा गावाचा विश्वास संपादन करू शकेल का, याची उत्सुकता संपूर्ण कथेत कायम राहते. या वेब सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, आशा ज्ञाते, मिलिंद शिंदे, अश्विनी कुलकर्णी आणि पद्मनाभ भिंड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी ग्रामीण वास्तव, सामाजिक प्रश्न आणि मनोरंजनाचा प्रभावी मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, ‘सौभाग्यवती सरपंच २’ ही महिला नेतृत्व, जिद्द आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी कथा आहे. जलसंवर्धन आणि गावपातळीवरील सुशासनासारख्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणारी ही मालिका प्रेक्षकांना निश्चितच आवडेल, असा विश्वास आहे. महिला नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी मांडणारी ‘सौभाग्यवती सरपंच २’ ही वेब सिरीज २४ जुलै २०२६ पासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.






