हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारले (फोटो- सोशल मीडिया)
इंडिगोच्या गोंधळाचा प्रवाशांना फटका
हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारला
इंडिगोने दिला 600 रूपयांचा परतावा
नवी दिल्ली: गेल्या पाच ते सहा दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सच्या सुरू असलेल्या गोंधळावरून प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. यावरून आता हायकोर्टाने केंद्र सरकारला झापले आहे. दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) या प्रकरणी सुनावणी पार पडली. इंडिगोने आतापर्यंत 600 कोटींचा परतावा दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान हायकोर्टाने केंद्र सरकारला तुम्ही काय करत होता असा थेट सवाल केला आहे. सुनावणीदरम्यान नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. केंद्र सरकारने इंडिगोची उड्डाणे 5 टक्क्याने कमी केली आहेत. दरम्यान हायकोर्टात याबाबतीत आज सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारने अशी स्थिती निर्माण का होऊ दिली असा थेट प्रश्न विचारला आहे. अन्य विमान कंपन्यांना 40 हजारांपर्यंत तिकीट दर वाढवण्याची सूट कशी मिळाली? तुम्ही नेमके काय करता होता? असे म्हणत हायकोर्टाने सरकारला फटकारले आहे.
अशा संकटांमुळे केवळ प्रवाशांना त्रास होत नाही तर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. डिजीसीएच्या नियमानुसार, प्रवाशांना परतावा दिला जावा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. तसेच परतावा इंडिगो एअरलाईन्सला परतावा देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत.






