नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अयोध्या, बॉंके बिहारी मंदिर आणि उज्जैनला भाविकांची गर्दी आहे (फोटो - सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांनी सुट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणात वाराणसीला भेट दिली आहे. मात्र यामुळे काशी विश्वनाथाच्या मंदिराबाहेर भाविकांची रांग लागली आहे. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा तबब्ल २ किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आहेत. प्रचंड गर्दीमुळे बाबा विश्वनाथांचे दर्शन ३ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. याचबरोबर भाविकांना सोयी देखील अपुऱ्या पडत आहेत. वाराणसी शहरातील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस पूर्णपणे भरलेले असून भाविकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत.
हे देखील वाचा : भाजप आमदार राहुल आवाडे ‘ॲटिव्ह’; तर सेनेचे खासदार धैर्यशील माने ‘गायब’
अयोध्येमध्येही अशीच परिस्थिती
रामजन्मभूमी अयोध्यानगरी देखील भाविकांनी फुलून गेली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या रामाच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच नवीन वर्षांची सुरुवात ही रामाच्या दर्शनासाठी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अयोध्येबद्दल बोलायचे झाले तर, राम मंदिरात दर्शनासाठी श्रद्धेसाठी लाटही वाढत आहे. तासनतास प्रतीक्षेनंतर राम लल्लाचे दर्शन होत आहे. त्याचबरोबर रामनगरी अयोध्येतील बहुतेक हॉटेल्स आणि धर्मशाळा भरल्या आहेत.
बांके बिहारींच्या दर्शनाबाबत सूचना जारी
त्या शिवाय, वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नवीन वर्षाच्या आधी वृंदावनातील बांके बिहारी मंदिरात भाविकांची संख्या अचानक वाढली आहे. मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापन समितीने असे म्हटले आहे की ५ जानेवारीपर्यंत मोठी गर्दी असेल. या संदर्भात, जारी केलेल्या सूचनांमध्ये बाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांनी त्यांची भेट पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना ५ जानेवारीनंतरच बांके बिहारी मंदिराचे दर्शन घेण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
हे देखील वाचा : आज संध्याकाळपासून ‘हा’ मार्ग राहणार बंद; कारण काय? वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार
उज्जैनच्या मंदिरात लाखो भाविक जमण्याची अपेक्षा
नववर्षाच्या पूर्वसंध्येला, लोक त्यांच्या देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी विविध मंदिरांमध्ये गर्दी करत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात १० ते १२ लाख भाविक जमण्याची अपेक्षा आहे. भाविकांची ही मोठी संख्या पाहता, मंदिर प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरक्षित आणि सुरळीत दर्शन सुनिश्चित करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दरवर्षी देशभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असते हे लक्षात घेतले पाहिजे. गर्दीमुळे योग्य दर्शन घेणे अनेकदा अशक्य होते. भाविकांना देवासमोर हात जोडून उभे राहण्यासाठी काही सेकंदही मिळत नाहीत. असे वातावरण लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी मंदिर दर्शनाला जाण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे.






