नवी दिल्ली: आज म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले. त्यांच्या मन की बात रेडिओ कार्यक्रमाचा हा १०७ वा भाग होता. आज पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज २६ नोव्हेंबरची तारीख आहे, जी कधीही विसरता येणार नाही. या दिवशी आपल्या देशावर सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडला होता. त्या हल्ल्यातून आपण सावरलो ही भारताची ताकद आहे आणि आज आपण दहशतवादाला चिरडत आहोत.
[read_also content=”मोहाली-चंदीगड सीमेवर शेतकऱ्यांच आदोलन! ३३ शेतकरी संघटना सहभागी, चंदीगड पोलिसही अलर्ट मोडवर https://www.navarashtra.com/india/farmers-gathered-near-moha-chandigarh-border-483903.html”]
ते पुढे म्हणाले की, २६ नोव्हेंबर हा दिवस आणखी एका कारणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. याच दिवशी १९४९ साली संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली होती. मी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देऊन आपण सर्व मिळून विकसित भारताचा संकल्प नक्कीच पूर्ण करू.
Speaking on a wide range of topics in #MannKiBaat. Do listen! https://t.co/KnDs7iRYoS
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2023
आज पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा प्रत्येकजण राष्ट्र उभारणीत सहभागी होतो, तेव्हाच प्रत्येकाचा विकास होऊ शकतो. संविधान निर्मात्यांच्या याच द्रष्टेपणाला अनुसरून भारताच्या संसदेने आता ‘नारी शक्ती वंदन कायदा’ संमत केला आहे, याचे मला समाधान आहे.
वोकल फॉर लोकलबाबत ते म्हणाले की, दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांवर गेल्या काही दिवसांत देशात ४ लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय झाला असून या काळात बनवलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. व्होकल फॉर लोकलची ही मोहीम संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करते.
आज, वाढत्या डिजिटल पेमेंटबद्दल बोलताना ते म्हणाले की, दिवाळीच्या निमित्ताने रोख पैसे देऊन काही वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड हळूहळू कमी होत असताना हे सलग दुसरे वर्ष आहे. म्हणजेच आता लोक अधिकाधिक डिजिटल पेमेंट करत आहेत. हे देखील खूप कौतुकास्पद आहे.
स्वच्छ भारत अभियानाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या मोहिमेने स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची विचारसरणी बदलली आहे. हा उपक्रम आज राष्ट्रीय भावनेचे प्रतीक बनला आहे, ज्यामुळे करोडो देशवासीयांचे जीवन सुधारले आहे. या मोहिमेने समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांना, विशेषतः तरुणांना मोठ्या प्रमाणात सहभागासाठी प्रेरित केले आहे.
यासोबत कोईम्बतूर येथे राहणारे लोगनाथन यांचे उदाहरण देताना ते म्हणाले की, तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे राहणारे लोगनाथन जी देखील अतुलनीय आहेत.त्यांच्या लहानपणी गरीब मुलांचे फाटलेले कपडे पाहून ते अनेकदा अस्वस्थ व्हायचे. यानंतर, त्यांनी अशा मुलांना मदत करण्याची शपथ घेतली आणि त्यांच्या कमाईचा एक भाग त्यांना दान करण्यास सुरुवात केली. जेव्हा पैशाची कमतरता होती तेव्हा लोगनाथन जी यांनी लोकांची शौचालये देखील स्वच्छ केली, जेणेकरून गरजू मुलांना मदत करता येईल.
जलसुरक्षेवर चर्चा करताना ते म्हणाले की, 21 व्या शतकातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे जलसुरक्षा. पाणी वाचवणे हे जीवन वाचवण्यापेक्षा कमी नाही.ज्यावेळी आपण सामूहिकतेच्या भावनेने कोणतेही कार्य करतो तेव्हा आपल्याला यशही मिळते. त्याचे उदाहरण म्हणजे देशातील प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येत असलेला ‘अमृत सरोवर’.
‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शन, आकाशवाडी न्यूज वेबसाइट, न्यूजऑनएअर मोबाइल अॅप आणि नरेंद्र मोदी मोबाइल अॅपच्या संपूर्ण नेटवर्कवर प्रसारित केला जातो. याशिवाय हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित केला जातो.