लोकसभा निवडणुकीतील सात टप्प्यातील निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांवर झालेल्या निवडणुकीचे ट्रेंड समोर आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सपा 35 जागांवर तर भाजप 34 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे. 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर असलेले अनेक प्रमुख उमेदवार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या नावांचा समावेश आहे. याचदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर टिका केली आहे.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सीबीआय, ईडी, अर्धी न्यायव्यवस्था यांना धमकावलं, ताब्यात घेतलं. लढाई संविधान वाचवण्याची होती. आमची लढाई घटनात्मक संस्था वाचवण्यासाठी होती. जनता अदानीना मोदींशी रिलेट करते. मोदी गेले तर अदानी गेले. आज शेअर बाजारात हेच दिसून आलं. गरीबांनी संविधान वाचवलं” असं राहुल गांधी म्हणाले. सरकार स्थापनेच काय करायच? त्या संदर्भात उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीत घटक पक्षांशी चर्चा करुन पुढची भूमिका ठरवू” असं राहुल गांधी म्हणाले.
तसेच भारतातील लोक त्यांच्या राज्यघटनेसाठी उभे राहतील हे माझ्या मनात आधीपासूनच होते. या लोकांनी आमची खाती जप्त करून मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. तेव्हा आम्हाला याची खात्री पटली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीही होत्या. जिथे युती लढली तिथे एकजुटीने लढले, असे राहुल गांधी म्हणाले. INDIA Alliance ने आपले व्हिजन देशासमोर मांडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय विरोधक राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या काळात कथन निर्माण करून भाजपला अनेक मुद्द्यांवर उत्तरे देण्यास भाग पाडले. आपल्या प्रदीर्घ निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक निकालांबाबत आशावादी राहण्यास सांगितले. राहुल गांधी म्हणाले की, ते काँग्रेसच्या बब्बर शेर कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाने सांगू शकतात की भारतात आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला निवडणुकीत फारसे यश मिळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांची भक्कम भिंत असल्याचे त्यांचे समर्थक आणि मित्रपक्षांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत विरोधकांचा विजय हा देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी मांडले.






