• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Food Civil Supplies And Consumer Protection Chhagan Bhujbal Thanked Ajit Pawar

‘सरळमार्गी, मनमोकळा नेता अजितदादा’ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण छगन भुजबळ यांनी अजित पवारांचे मानले आभार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमच्या सरकारपुढे अनेक संकटे आली. त्यात सर्वात मोठे संकट हे कोरोनाचे आहे. जे संपूर्ण जगावर घोंघावत आहे आणि अजूनही संपलेले नाही. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, निसर्ग चक्रीवादळे, अतिवृष्टी अशी अनेक संकटे मधल्या काळात आली. पण मुळातच जनतेचे कल्याण या उदिष्टाने एकत्र आलेल्या आमच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व संकटांशी दोन हात केले. या सर्वात राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोणत्याही विभागाचा अर्थपुरवठा थांबवला नाही. राज्याचे अर्थचक्र चालू राहावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करताना त्यांनी राज्याच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिले.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Jul 22, 2021 | 01:30 PM
‘सरळमार्गी, मनमोकळा नेता अजितदादा’ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण छगन भुजबळ यांनी अजित पवारांचे मानले आभार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमच्या सरकारपुढे अनेक संकटे आली. त्यात सर्वात मोठे संकट हे कोरोनाचे आहे. जे संपूर्ण जगावर घोंघावत आहे आणि अजूनही संपलेले नाही. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, निसर्ग चक्रीवादळे, अतिवृष्टी अशी अनेक संकटे मधल्या काळात आली. पण मुळातच जनतेचे कल्याण या उदिष्टाने एकत्र आलेल्या आमच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व संकटांशी दोन हात केले. या सर्वात राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोणत्याही विभागाचा अर्थपुरवठा थांबवला नाही. राज्याचे अर्थचक्र चालू राहावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करताना त्यांनी राज्याच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस. दादांचे नाव माहीत नाही, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेहमीच दादांच्या करारी बाण्याचे कौतुक होत असते. अजितदादांचा प्रशासनातील वचक आणि काम करण्याच्या पद्धतीचे अगदी त्यांचे विरोधकसुद्धा कौतुक करतात.

शरद पवार यांच्यासारख्या मात्तब्बर नेत्याच्या मुशीत तयार झालेल्या अजितदादांचा स्व:ताचा असा कार्य लौकिक आहे. शरद पवार हे लोकसभेत असताना संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्राची जबाबदारी दादांनी सांभाळली. दादांच्या विकासकामांवर बारामतीच्या जनतेने विश्वास ठेवला आणि बारामती मतदारसंघातून विधानसभेवर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४, २०१९ मध्ये आमदार म्हणून त्यांना निवडून पाठवले. सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये ते शेती आणि उर्जामंत्रीही होते. शरद पवार हे मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते मंत्रीमंडळात मंत्री होते. त्यानंतर आमच्या आघाडीचे सरकार असताना म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्येही अजित पवार यांनी विविध मंत्रीपदे भुषवली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दादा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून कामांचा सपाटा सुरू केला. दादांचा स्वभाव हा अतिशय सरळमार्गी आणि मनमोकळा आहे. प्रशासनावर उत्तम पकड असलेल्या दादांचा जनसामान्यांमध्ये मोठा नावलौकिक आहे. त्यांच्य़ा स्पष्टोक्तेपणाची देखील नेहमीच चर्चा होत असते. काम होत असेल तर तिथल्या तिथे सोक्ष-मोक्ष. पण काम होणार नसेल तर नाही म्हणून स्पष्टपणे सांगणे, अशी अजित पवारांची ख्याती आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमच्या सरकारपुढे अनेक संकटे आली. त्यात सर्वात मोठे संकट हे कोरोनाचे आहे. जे संपूर्ण जगावर घोंघावत आहे आणि अजूनही संपलेले नाही. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, निसर्ग चक्रीवादळे, अतिवृष्टी अशी अनेक संकटे मधल्या काळात आली. पण मुळातच जनतेचे कल्याण या उदिष्टाने एकत्र आलेल्या आमच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व संकटांशी दोन हात केले. या सर्वात राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोणत्याही विभागाचा अर्थपुरवठा थांबवला नाही. राज्याचे अर्थचक्र चालू राहावे यासाठी सातत्याने प्रयत्न करताना त्यांनी राज्याच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिले.

कोरोनाचा मुकाबला करताना राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्याच्या अर्थसंकल्पात त्यांनी आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद केली. त्यामुळेच आपण राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोनाशी लढण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करू शकलो.

कोरोना संकटामुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडल्याने आर्थिक वर्षात विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लागण्याची शक्यता होती. तरीही उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी निधी वितरित करताना नाशिक जिल्ह्यासाठी हात काहीसा सैल सोडला आणि नाशिक जिल्ह्याला भरघोस निधी दिला. शासनाने ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत प्रतिबंधाच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. प्रतिबंधाच्या कालावधीत गोरगरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू,  दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मोफत शिवभोजन थाळीचा निर्णय तर सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा देणारा ठरतो आहे. त्यासाठी देखील अजित पवार यांनी भरघोस निधी देण्याची तयारी दाखवली.

एखादे लोककल्याणकारी काम जर दादांना सुचले तर त्या कामाला पुर्णत्वास नेल्याशिवाय ते शांत बसत नाहीत, याचा मला अनुभव आहे. अजितदादा राज्याचे ऊर्जामंत्री असताना, महावितरणमध्ये ‘लाईनवूमन’ म्हणून महिलांना संधी देण्याचा क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी भरती केलेल्या मुली, लाईनवुमन म्हणून आज मुलांपेक्षाही चांगले काम करत आहेत.

आपला महाराष्ट्र आज देशातीलच नव्हे तर जगातील आघाडीच्या राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्राची महाविकास आघाडी सर्वसमावेशक आहे. ती केवळ पायाभूत सुविधांच्या निर्मितीपुरती मर्यादित नाही, तर पुरोगामी विचारधारा, सामाजिक सुधारणा तसेच राज्य शासनाच्या क्रांतिकारी निर्णयांमध्ये ही महाविकास आघाडी ठळकपणे दिसते. अनेक महापुरुषांनी, संत-महात्म्यांनी इथल्या मातीत रुजवलेल्या पुरोगामी आणि प्रगतशील विचारांमधून प्रेरणा घेऊन महाविकास आघाडी शासन काम करत आहे.  या महाविकास आघाडीचे शिलेदार म्हणजेच उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा काम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. अजित पवार हे ६२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र दादांकडे पाहून ते ६२ वर्षांचे आहेत असे कोणाला पटणारही नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी सतत धडपड करणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे अजितदादा यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.

छगन भुजबळ

मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य

पालकमंत्री नाशिक जिल्हा

Web Title: Food civil supplies and consumer protection chhagan bhujbal thanked ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2021 | 01:29 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar birthday
  • Chhagan Bhujbal

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम
2

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
3

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान
4

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.