• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Pakistans Defense Minister Khawaja Asif On Pahalgam Attack Were Not Involved

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया; संरक्षण मंत्री म्हणतात, ‘आमचा काहीही संबंध नाही’

Khawaja Asif Pahalgam statement : जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 23, 2025 | 11:35 AM
Pakistan's Defense Minister Khawaja Asif on Pahalgam attack We’re not involved

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया; संरक्षण मंत्री म्हणतात, 'आमचा काहीही संबंध नाही' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 इस्लामाबाद : जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही”, तसेच भारतातच लोक सरकारविरोधात उठले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

भारताच्या आरोपांना पाकिस्तानकडून नकार

ख्वाजा आसिफ यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले, “आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. आम्ही कोणत्याही स्वरूपाच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही. पहलगाम हल्ल्यामागे आमचा हात असल्याचा आरोप पूर्णतः निराधार आहे.” मात्र, त्याचबरोबर त्यांनी वादग्रस्त विधान करत, भारतातील अंतर्गत स्थितीवर टीका केली. “भारताचे सध्याचे सरकार अल्पसंख्याकांवर अन्याय करत आहे. बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाविरोधात हिंसाचार वाढला आहे. त्यामुळे देशातील नागरिक उठाव करत आहेत,” असे त्यांनी म्हटले.

We have absolutely nothing to do with it. We reject terrorism in all its forms and everywhere, says Pakistan’s Defence Minister Khawaja Asif on the #Pahalgam attack.#pahalgamattack pic.twitter.com/qGiTz6uVOn — Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) April 23, 2025

credit : social media

पहलगाम हल्ल्यात 26 जण ठार, परदेशी पर्यटकांचाही समावेश

मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात २६ जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळच्या दोन परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांच्या वाहनांच्या ताफ्यावर अचानक गोळीबार केला. या घटनेनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली. ही बैठक सौदी अरेबियाहून पंतप्रधान परतल्यानंतर थेट विमानतळावरच घेण्यात आली, हे विशेष.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रावलकोटमध्ये रचला गेला होता पहलगाम हल्ल्याचा कट? ‘लष्कर-ए-तोयबाची’ उघड धमकी आणि भारताविरोधातील कटाचे नवे पुरावे

पाकिस्तानकडून दिशाभूल करणारे विधान?

भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा संशय आहे. मात्र, ख्वाजा आसिफ यांनी या आरोपांना उलटवून भारतातच अस्थिरता असल्याचे चित्र रंगवले. “नागालँड, मणिपूर आणि काश्मीरमध्ये जनता सरकारविरोधात उभी राहिली आहे. लोक आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत.” असे ते म्हणाले. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे जबाबदारी नाकारण्याचे आणि भारताच्या अंतर्गत परिस्थितीवर दोष टाकण्याचे धोरण पाळले जात आहे. तथापि, भारताने जागतिक पातळीवर या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर दबाव आणण्याचे संकेत दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर

या हल्ल्यानंतर भारताने पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी संयुक्त राष्ट्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पंतप्रधान मोदींनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. याशिवाय, काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : J&K attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याने जग हादरले, 26 निष्पापांचा मृत्यू, आंतरराष्ट्रीय निषेध

भारत-पाकिस्तान संबंधांवर पुन्हा एकदा सावली

पहलगाममध्ये झालेला हल्ला फक्त काश्मीरपुरता मर्यादित न राहता, तो भारत-पाकिस्तान संबंधांवर पुन्हा एकदा सावली टाकणारा ठरतोय. पाकिस्तानकडून जबाबदारी नाकारणे आणि भारतातच असंतोष असल्याचे चित्र उभे करणे ही जुनी पद्धत असली, तरी यावेळी जागतिक समुदाय काय भूमिका घेतो याकडे लक्ष लागले आहे. भारताने मात्र स्पष्ट केलं आहे. “दहशतवाद्यांवर कारवाई हीच खरी प्रत्युत्तराची भाषा आहे.”

Web Title: Pakistans defense minister khawaja asif on pahalgam attack were not involved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • jammu and kashmir news
  • Jammu Kashimir
  • Pahalgam Terror Attack
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
1

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले
2

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले

Crackdown On Smuggling: खजूर आणि सौंदर्यप्रसाधनांच्या माध्यमातून घुसखोरी; दहशतवादाचा नवा पॅटर्न
3

Crackdown On Smuggling: खजूर आणि सौंदर्यप्रसाधनांच्या माध्यमातून घुसखोरी; दहशतवादाचा नवा पॅटर्न

भयानक! TTP दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर…; कुठे घडली घटना?
4

भयानक! TTP दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर…; कुठे घडली घटना?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.