घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या 'हे' प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य
सर्वच महिलांना आपले केस कायमच सुंदर आणि चमकदार हवे असतात. केसांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट, हेअर केअर प्रॉडक्टचा सुद्धा वापर केला जातो. मात्र पूर्वीच्या काळी कोणतेही हेअर केअर प्रॉडक्ट किंवा केसांसंबधित ट्रीटमेंट उपलब्ध नव्हत्या. तरी सुद्धा भारतीय राण्यांचे केस अतिशय घनदाट, मऊ आणि मजबूत होते. निसर्गाच्या कुशीत आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले उपाय करून केसांची काळजी घेतली जायची. मात्र हल्लीच्या महागड्या ट्रीटमेंट करून सुद्धा केसांची गुणवत्ता चांगली राहत नाही. आज आम्ही तुम्हाला घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या कोणते आयुर्वेदिक हेअर मास्क वापरायच्या, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. हे हेअर मास्क वापरल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यासोबतच केस अतिशय सुंदर होतील.(फोटो सौजन्य – istock)
वातावरणातील बदलांमुळे केस कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर मेथी दाण्यांच्या हेअर मास्कचा वापर करावा. मेथी दाण्यांमध्ये असलेले घटक टाळूवर वाढलेला कोंडा कमी कारण्यासोबतच केस गळती सुद्धा थांबतात. यासाठी वाटीमध्ये मेथी दाणे भिजत ठेवा. ५ तास मेथी भिजल्यानंतर मऊ होईल. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मेथी दाणे आणि दही घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. ३० मिनिट ठेवल्यानंतर हेअर मास्क पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा लावल्यास केस मजबूत आणि स्वच्छ होतील.
केसांची काळजी घेण्यासाठी महिला जास्वदींच्या फुलांचा हेअर मास्क बनवून केसांवर लावावा. जास्वदींची फुले मिक्सरच्या भांड्यात टाकून पेस्ट बनवा. तयार केलेल्या पेस्टमध्ये नारळाचे दूध मिक्स करून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट केसांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. यामुळे केस अतिशय मुलायम आणि सॉफ्ट होण्यास मदत होईल. नारळाचे दुधात असलेले प्रोटीन केस दाट करण्यास मदत करते. हेअर मास्क ३० मिनिट केसांवर ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला आवळा केसांच्या वाढीसाठी खूप जास्त प्रभावी ठरतो. पूर्वीच्या काळी शाम्पू म्हणून शिकाकाईचा वापर केस स्वच्छ करण्यासाठी केला जायचा. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक मुळांपासून मजबूत करण्यास मदत करतो. राजघराण्यांमध्ये कोमट पाण्यात शिकेकाई भिजत ठेवून नंतर केसांच्या मुळांवर लावून काहीवेळ तशीच ठेवली जायची. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुतले जायचे. तांदळाच्या पाण्यात असलेले गुणकारी घटक केस मऊ करतात.






