तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
देशभरात सगळीकडे प्रचंड उष्णता वाढली आहे. तापमानात सतत होणाऱ्या बदलांचे थेट परिणाम शरीरावर दिसून येत आहेत. मुंबईसह देशभरात सगळीकडे तापमान ४२, ४३ डिग्री किंवा त्याच्यापेक्षा ही पुढे गेले आहे.उष्णता वाढल्यामुळे शरीरावर त्याचे परिणाम दिसून येत आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर घामाच्या धारांनी संपूर्ण शरीर ओले चिंब होऊन जाते. थंड पदार्थ, भरपूर पाणी प्यायल्यानंतर सुद्धा तहान कमी होत नाही. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर डोळ्यांची जळजळ होणे, पोटात जळजळ वाढणे तर काहीवेळा तळपायांमध्ये उष्णता वाढून आग होते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण तरीसुद्धा फारसा फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तळपायांमध्ये वाढलेली उष्णता आणि जळजळ कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत काशाची वाटी वापरली जाते. हा उपाय शरीरासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. यासाठी काशाचा वाटीला थोडस तूप घालून तळपायांवर घासा.वाटीवरील तूप पूर्णपणे काळे झाल्यास समजून जावे की शरीरातील उष्णता बाहेर पडत आहे. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल.
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत चंदनाचा वापर त्वचा आणि संपूर्ण आरोग्यासाठी केला जात आहे. यासाठी चंदन पाणी घालून उगळून घ्या. त्यानंतर तयार केलेला लेप बेंबीभोवती लावून ठेवा. हा उपाय नियमित रात्री झोपण्याआधी केल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल. आठवडाभर नियमित चंदन बेंबीभोवती लावल्यास फरक दिसून येईल.
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचे सेवन करावे. यासाठी तांदूळ पाण्याने ४ वेळा धुवून घ्या. त्यानंतर पाण्यात भिजत ठेवा आणि ५ तासांनी त्याच्या वरील पाणी काढून प्यावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता, पित्त, वाढलेली ऍसिडिटी कमी होण्यास मदत होईल आणि शरीर थंड राहील.
Ans: शरीरात उष्णता वाढणे, व्हिटॅमिन B12 ची कमतरता, नर्व्हस सिस्टीमशी संबंधित समस्या, मधुमेह किंवा दीर्घकाळ उभे राहणे ही प्रमुख कारणे असू शकतात.
Ans: शरीरातील तापमान वाढल्यामुळे रक्तप्रवाहात बदल होतो आणि त्यामुळे तळपायांमध्ये जळजळ जाणवते.
Ans: थंड पाण्यात पाय बुडवणे, नारळ तेलाने मसाज करणे, तूप लावणे, अॅलोवेरा जेल वापरणे आणि पुरेसे पाणी पिणे उपयुक्त ठरते.






