उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर डोकं खूप जास्त दुखतं? मग 'हे' उपाय करून मिळवा कायमचा आराम, जुनाट त्रासांपासून मिळेल सुटका
डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
उन्हाळ्यात दुखीचा त्रास कशामुळे होतो?
उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?
राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते तर काहीवेळा डोकेदुखी आणि शरीरसंबंधित इतर समस्या उद्भवू लागतात. उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा आणि डोकेदुखीचा त्रास वाढतो. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर कितीही काही केले तरीसुद्धा डोकेदुखीपासून आराम मिळत नाही आणि शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा त्याकडे लक्ष दिले जात नाही. पण असे न करता वेळीच उपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात वाढलेल्या डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तात्काळ आराम मिळेल.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोकेदुखीचा त्रास प्रामुख्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर उद्भवतो. शरीरास आवश्यक असलेली पाण्याची पातळी आणि क्षार घामावाटे निघून गेल्यानंतर डोकेदुखी, अशक्तपणा, थकवा, डोकं जड झाल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कायमच संतुलित असणे फार आवश्यक आहे. दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे उन्हाळ्यात खूप जास्त पाणी प्यावे.
उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरायला जाताना डोक्यावर स्कर्फ किंवा ओढणी बांधून बाहेर जावे. कारण कडक उन्हात कुठेही गेल्यानंतर उन्हामुळे डोकेदुखी किंवा हिट स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. उन्हाळ्यात त्वचा आणि शरीराची काळजी घेतली जाते, पण डोळ्यांकडे जास्त लक्ष दिले जात नाही. असे न करता कडक उन्हात कुठेही बाहेर जाताना डोळ्यांवर चष्मा किंवा सनग्लास लावूनच बाहेर जावे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जंक फूडचे अतिसेवन करणे टाळावे. दैनंदिन आहारात सहज पचन होईल अशाच पदार्थांचा समावेश करावा. आहारात फळे, भाज्या आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पचनक्रिया सुद्धा निरोगी राहते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. पिज्जा,बर्गर, चिप्स, कॅफेनयुक्त पदार्थांपासून उन्हाळ्यात दूर राहणे चांगले आहे.
High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक; आजच खाणं टाळा
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात पौष्टिक पदार्थांसोबतच पुदिना, सब्जा बिया आणि इतर पेयांचे सुद्धा सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नारळ पाणी, लिंबू पाणी इत्यादी पेय प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरायला जाताना सुती कपडे परिधान करून जावेत.
Ans: अति उष्णता, शरीरातील पाण्याची कमतरता, थकवा आणि डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते.
Ans: भरपूर पाणी पिणे, थंड ठिकाणी आराम करणे, नारळपाणी किंवा लिंबूपाणी घेणे आणि शरीर थंड ठेवणे फायदेशीर ठरू शकते.
Ans: ताक, नारळपाणी, लिंबूपाणी, कोकम सरबत आणि घरगुती शरबत शरीराला थंड ठेवण्यास मदत करू शकतात.






