शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश
राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या गर्मीमुळे शरीरसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. शरीरात उष्णता वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. पोटात जळजळ, डोके दुखी, कपाळ जड झाल्यासारखे वाटणे, डोळ्यांची जळजळ इत्यादी अनेक उद्भवतात. पोटात उष्णता वाढल्यानंतर अपचन, ऍसिडिटी, गॅस, खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. शरीरात उष्णता वाढल्यानंतर थंड पेयांचे सेवन केले जाते. पण यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोणते आयुर्वेदिक लेप कपाळावर लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील आणि उष्णता कमी होऊन शरीर फ्रेश राहील. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले पदार्थ शरीरात थंडावा टिकवून ठेवतात.(फोटो सौजन्य – AI)
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक घरात चंदनाचा वापर त्वचेसंबंधित समस्यांसाठी केला जात आहे. चंदन, मुलतानी माती, पुदिना किंवा कोरफड यांसारखे नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले पदार्थ शरीरात थंडावा टिकवून ठेवतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. या पदार्थांपासून बनवलेला लेप उष्णता कमी करून शरीरात थंडावा टिकवून ठेवतो. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कपाळावर चंदनाचा लेप लावावा. यासाठी वाटीमध्ये चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट कपाळावर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या.
उन्हामुळे वाढलेली डोकेदुखी, कपाळाची आग किंवा थकवा कमी करण्यासाठी मुलतानी माती खूप जास्त फायदेशीर आहे. मुलतानी मातीचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे. शरीरात उष्णता वाढल्यास कपाळावर किंवा मानेवर मुलतानी मातीचा लेप लावावा. काहीवेळ ठेवल्यानंतर थंड पाण्याने लेप स्वच्छ धुवून टाका. यामुळे त्वचा सुंदर होईल आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल.
Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश
उष्णतेच्या त्रासापासून कायमची सुटका हवी असेल तर कोरफड जेलचा वापर करावा. कोरफडीच्या गरात चिमूटभर हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या. उन्हामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ आणि उष्णता कमी करण्यासाठी कोरफड जेलपासून बनवलेला लेप चेहऱ्यावर लावावा. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर काकडी उपलब्ध असतात. काकडीचा रस काढून डोळ्यांभोवती आणि डोक्यावर लावल्यास उष्णता कमी होण्यासोबतच त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होईल. तसेच वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नियमित भरपूर पाणी, ताक पिणे आवश्यक आहे. घरगुती उपाय करून सुद्धा शरीरात उष्णता जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.






