भारत पाकिस्तान बोर्डरवर वसलं आहे देशातील सर्वात शेवटच गाव
द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…
कोणते आहे हे गाव?
तुरतुक हे भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर वसलेले गाव आहे. डोंगर, हिरव्यागार दऱ्या, वाहणारी नदी आणि लहान झरे यांच्या सान्निध्यात वसलेले हे गाव निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखे आहे. ट्रेकिंग आणि शांत पर्यटनासाठी येथे दूरदूरून लोक येतात. लडाखच्या शेवटच्या टोकावर असल्यामुळे याला विशेष ओळख मिळाली आहे.
भारतात कसे सामील झाले?
1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धानंतर हे गाव भारताच्या ताब्यात आले. त्यापूर्वी हे क्षेत्र बाल्टिस्तानचा भाग मानले जात होते. त्यामुळे आजही येथे बाल्टी परंपरा, भाषा आणि राहणीमान जपले गेले आहे. सीमेच्या अतिशय जवळ असल्यामुळे येथे सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. गावापुढे थांग नावाचे ठिकाण आहे, मात्र ते सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद आहे.
तुरतुकची खास वैशिष्ट्ये
येथे कसे पोहोचावे?
तुरतुकला भेट देण्यासाठी विशेष परवानगी (इनर लाईन परमिट) आवश्यक आहे. प्रथम लेह येथे पोहोचावे लागते. लेहमधील जिल्हाधिकारी कार्यालयातून इनर लाईन परमिट काढावे लागते. हे परमिट साधारणपणे पाच दिवसांसाठी वैध असते. गावात प्रवेश करताना आणि परतीच्या वेळी हे परमिट सोबत ठेवणे आवश्यक आहे, कारण सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केली जाते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






