एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षण रद्द करण्यावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Muslim reservation Cancellation: मुंबई : राज्यामध्ये मुस्लीम समाजाला धक्का बसेल असा निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लीम समाजाचे 5 टक्के आरक्षण काढून टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडी सरकारने दिलेले हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. यावरुन विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. याबाबत आता एमआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सरकारवर खरपूस टीका केली आहे. गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित राहू नये ही आमची अपेक्षा असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
एमआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच मुस्लिम आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा शासनादेश जारी केले आहेत. यावर ते म्हणाले की, “मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला होता.गरीब लोकांना मदत करण्याची गरज आहे. ब्राम्हण समाजामध्येही खूप श्रीमंत लोक आहेत, असे नाही, त्यामुळे ज्यांना शिक्षणाची गरज आहे त्यांना शिक्षण आणि नोकरी मिळाल्या पाहिजेत,” अशी अपेक्षा इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर
पुढे ते म्हणाले की, “UPSC मध्ये राज्यातील मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. आमच्या समाजातीलही काही लोक आहेत, ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण ते घेऊ शकत नाहीत, अशा लोकांना त्यांचे उत्पन्नाचा स्त्रोत बघून काही सवलत देण्यात यावी, याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न केली आहेत. ब्राम्हण समाजामध्येही काही गरीब लोक आहेत, ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण ते घेऊ शकत नाहीत, त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
आता निवडणुका आल्या की काही लोक घराबाहेर येतात. आमच्या शहरातही आले होते. त्यांनी म्हटले की, “आपल्याला या व्यक्तीला मतदान करायचे आहे. मग तुम्ही पाच वर्षातून एकदाच येणार आहात का? आता समाजावर संकट आले आहे. आता समोर या. आमच्या समाजातील जे मौलाना आहेत, जे राजकारणाच्या वेळी निवडणुकीच्या दोन ते तीन महिने अगोदर खूप सक्रिय होतात ते कशामुळे होतात का होतात हे सर्वांना माहिती आहे. आता मी तुम्हाला बीडचे सांगतो… तिथलच्या सर्व मौलवी लोकांनी निर्णय घेतला होता की, आपल्या सर्वांना अजित पवार यांच्यासोबत जायचे आहे, मग त्यांना ऐकून दिले मतदान. माझी अपेक्षा ही आहे की, या सर्व मौलाना लोकांनी नेतृत्व करावे, मी मागे राहणार आहे,’ असा टोला इम्तियाज जलील यांनी इतर मुस्लीम नेत्यांना लगावला आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्रसह 10 राज्यातील राज्यसभा निवडणूका जाहीर; शरद पवार पुन्हा खासदारकी स्वीकारणार का?
पुढे ते म्हणाले की, “पाच वर्ष आम्ही रस्त्यावर आंदोलन करतो आणि निवडणूक आली की, आमचे हे काही लोकं दुकान उघडायला येतात. यांना मतदान करा त्यांना मतदान करा हे धंदे चालवतात. आता यांची जबाबदारी आहे की, त्यांनी याचे नेतृत्व करावे आम्ही त्यांच्या मागे आहोत. गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित राहू नये,” ही आमची अपेक्षा असल्याचे एमआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे.






