Photo Credit- X@ CMO Maharashtra 'त्या' सर्वांवर कारवाई होणार, प्राजक्ता माळीच्या भेटीनंतर फडणवीसांचे आश्वासन
मुंबई: बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सोबत मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराडला तातडीने अटक करा आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा, अशी मागणी बीड वासियांकडून होत आहे. या सर्व प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचेही नाव घेतल्याने या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी सुऱेश धस यांनी प्राजक्ता माळीसंबधी आक्षेपार्ह विधान केल्याने प्राजक्ता चांगलीच भडकली. दोन दिवसापूर्वी तिने पत्रकार परिषद घेत या सर्व प्रकरणावर भाष्यही केलं.
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्याच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट करून पोस्ट कऱण्यात आली आहे. “अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.”
परळीत इव्हेंट मॅनेजमेंट खूप प्रमाणात केलं जातं. वाल्मिक कराडला या इव्हेंट मॅनजमेंट करण्याची हौस असते. धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम..! रश्मिका मंदाना, सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याच प्रसार करावा,असं सुरेश धस यांनी म्हटलं होते. त्यानंतर प्राजक्ता माळी चांगलीच संतापली होती. सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीनेही पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांना जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे.
प्राजक्ता माळी म्हणाली, ” महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही.कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांत जाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहे. मी परळीच नाही तर महाराष्ट्रभरात काम केलं आहे. यापुढेही करत राहील.यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांसोबत माझे फोटो आहेत पण त्याचा अर्थ तुम्ही माझे नाव कुणासोबतही जोडणार का? एक महिला कलाकार म्हणून मला हे अतिशय निंदनीय वाटतं. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. तुम्ही महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात तर महिलांच्या कर्तृत्त्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. राजकाण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्त्वावर यशस्वा होऊ शकत नाही का, असा सवालही प्राजक्ताने यावेळी उपस्थित केला. तसेच, अशा पद्धतीची वक्तव्ये करून तुम्ही स्वत:चीच मानसिकता दाखवली, अशी टीकाही तिने यावेळी केली.
शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात; गाडीचे नुकसान तर वायकर