शिवरायांचा हा किल्ला तब्बल सहा महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला; तहीही या असणार अटी
छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पराक्रमाचा साक्षीदास असलेला विशाळगडावर गेल्या पाच महिन्यांपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. विशाळगडावरील ही संचारबंदी अखेर जिल्हा प्रशासनाने शिथिल केली आहे. याबाबतचा अध्यादेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जारी केला आहे. मात्र काही अटी आणि शर्तींचे पालन केलं तरचं पर्यटकांना किल्ले विशाळगडावर जाता येणार आहे.
विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाविरोधात गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींनी आवाज उठवला होता. यानंतर विशाळगड मुक्त करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र या आंदोलनाला गजापूर गावात हिंसक वळण लागल्यानंतर राज्य सरकारने विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.
दरम्यान किल्ला पाच महिन्यांपासून बंद असल्यामुळे किल्ला आणि परिसरात गावांवर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली होती. यामुळे चार-पाच दिवसांपूर्वी गडावरील नागरीकांनी संचारबंदी उठवण्याची मागणी करत धरणे आंदोलन केलं होतं. याची सरकारकने गंभीर्याने दखल घेत गडावरील संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे. पर्यटकच या आजूबाजूच्या गावांचा उत्पन्नाचं प्रमुख साधन आहेत.
गडावरील जरी बंदी उठवण्यात आली तरी पर्यटकांना नियम आणि अटींचं पालून करावं लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. 31 जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे. दरम्यान विशाळगडावर येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
विशाळगड जिल्हा प्रशासनाने 31 जानेवारीपर्यंत पर्यटकांना आणि देवदर्शनासाठी खुला करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र गडावर पर्यटकांना दहा ते पाच या वेळेतच सोडले जाणार आहे. कोणत्याही नागरिकांना सायंकाळी पाचनंतर गडावर मुक्काम करता येणार नाही. तसंच किल्ल्यावरील धार्मिक कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. दरम्यान किल्ले विशागडावर कोणालाही मासांहार पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत किंवा शिजवून खाता येणार नसल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.