Ajit Pawar Plane Crash: ‘विश्वास बसणार नाही असा क्षण’; अजित पवारांच्या निधनावर नीलम गोऱ्हे भावूक
Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ व लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांच्या आज सकाळी झालेल्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विश्वास बसणार नाही असा क्षण असून राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला आहे, अशा शब्दांत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामतीमध्ये विमान लॅडिंग दरम्यान अपघाती निधन झाले. या अपघतात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूमुळे राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेवर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार: मुख्यमंत्री पदाची हुलकावणी: एका संघर्षाचा न संपलेला प्रवास
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सलग सात वेळा विधानसभेवर निवडून आलेले अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड, वेळेचे काटेकोर नियोजन आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात होते. कोरोना काळात त्यांनी सातत्याने आढावा बैठका घेऊन जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले. तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांसाठीचा निधी संपूर्ण महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्याचा दूरगामी निर्णय त्यांच्या नेतृत्वाची दृष्टी दर्शवतो.
विधानपरिषद उपसभापतीपदाच्या काळात विविध समित्या व सभागृहाच्या कामकाजात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, शेती व विकास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त करत, डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार हे उत्तम संसदपटू होते आणि विधानपरिषदेत त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना व सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
Sanjay Gandhi : संजय गांधीचाही झाला होता विमान अपघातात दु:खद अंत; नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी?






