मोदींच्या नेतृत्वावर विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाला वाढता पाठिंबा मिळत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात भारतीय जनता पक्षाचे ३५० हून अधिक खासदार व राज्यांमध्ये ४५ असून अधिक खासदार निवडून आणण्यासाठी महाविजय संकल्प अभियान सुरू आहे. भाजपने लोकाभिमुख कारभार केला असून ते सर्वांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सध्या दौरे सुरू आहेत. असेही महाडिक यांनी सांगितले.
भास्कर जाधव यांच्या विधानकडे लक्ष देण्याची गरज नाही
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बदललेल्या बद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार महाडिक म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांना एका जिल्हा पुरते मर्यादित आपण पाहू नये. त्यांच्याकडे दोन जिल्ह्याची पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यांचे प्रमोशन आहे असे ही महाडिक यांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षावर दंगली घडवण्याचा आरोप केला होता. त्यावर महाडिक म्हणाले, भास्कर जाधव यांनी जे विधान केले त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. सत्ता गेल्यामुळे ते भडक विधाने करत आहेत.