बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टरच लांबवला; शिक्रापुरात घडली विचित्र घटना
तालुक्यातील गांधीनगर (कोडशी बू.) आणि वणी तालुक्यातील तेजापूर या गावांदरम्यान नदीचे अंतर अवघे २ किलोमीटर असले तरी पुलाअभावी ग्रामस्थांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त बोजा नागरिकांवर पडत आहे. विशेषतः विद्यार्थी, रुग्ण व शेतकरी यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. या नदी घाटावर पूल उभारण्यात आल्यास यवतमाळ जिल्ह्यातील वणी व झरी तालुक्यातील ग्रामस्थांना कमी अंतरात सुरक्षित प्रवास करता येईल, कोरपना-जिवतीमार्गे तेलंगणा राज्यापर्यंत थेट संपर्क मार्ग उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने यात लक्ष घालून पुलाची निर्मितीसाठी पाऊले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नाल्यांवरील पुलांचा मोठा अनुशेष
कोरपना तालुक्यातील अनेक मार्गांवर नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत होते. यात कोडशी खुर्द, पिंपरी, धोपटाळा, शेरज बुज, कोडशी बुज, कोडशी खुर्द, पिंपरी, शेरज बुज, कोरपना, कुसळ, हातलोणी, घाटराई, कोरपना, कन्हाळगाव, धानोली, पिपडा, कुसळ, पिपर्दा, कारगाव बुज, पाटागुडा, कोल्हापूरगुडा, मायकलपूर, भोईगुडा, जेवरा, कन्हाळगाव, श्रीकृष्ण मंदिर, हेटी, शेरज बुज या मार्गावरील नाल्यावर पुलाची मागणी केली आहे.
बॅरेज बंधारा कम पुलाची अपेक्षा
ग्रामस्थांकडून गांधीनगर तेजापूर नदी घाटावर साध्या मुलाऐवजी बॅरेज बंधारा कम पूल उभारण्याची जोरदार मागणी होत आहे. असा प्रकल्प साकार झाल्यास परिसरातील शेती संचनाला मोठा फायदा होईल. तसेच उद्योगांना पाणीपुरवठा पुलभ होऊन उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई मोठ्या नमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Chembur Accident: धक्कादायक! चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले; एकाचा जागीच मृत्यू
Ans: चंद्रपूर–यवतमाळ सीमेवरील गांधीनगर (कोडशी बू.)–तेजापूर नदी घाटावर.
Ans: नावेतून धोकादायक प्रवास, मोठा वळसा, वेळ व पैशाचा अतिरिक्त खर्च.
Ans: साध्या पुलाऐवजी बॅरेज कम पूल उभारून कायमस्वरूपी दळणवळण सुविधा द्यावी.






