स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारीसाठी प्रशासनाची तयारी! चंद्रभागा नदीपात्रात ५० स्वच्छता कर्मचारी, ३० ते ३२ लाख भाविकांसाठी नियोजन
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. ‘स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारी, आनंदी वारी’ या संकल्पनेअंतर्गत चंद्रभागा नदीपात्र आणि वाळवंट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, वाळवंट कायम स्वच्छ ठेवण्यासाठी ५० स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली व चंद्रभागा नदीपात्राच्या दोन्ही बाजूंवरील झुडपे, राडारोडा आणि कचरा हटवून संपूर्ण परिसराचे सपाटीकरण करण्यात येत आहे. केवळ वारीपूर्वीच नव्हे, तर संपूर्ण यात्रा कालावधीत आणि भाविकांची गर्दी ओसरेपर्यंत स्वच्छता मोहीम अखंड सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.(फोटो सौजन्य – AI)
स्वच्छतेसाठी नदीपात्रात मोठ्या कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात येत असून, वाळवंटाच्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद आणि अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामाची पाहणी करून पालकमंत्री गोरे यांनी समाधान व्यक्त केले. या पाहणीवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आ. समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे कार्यकारी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह विविध
पालकमंत्र्यांनी लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करतात.
त्यामुळे स्वच्छ, निर्मळ आणि सुरक्षित वाळवंट उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
यंदाच्या वारीत वारकऱ्यांसाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी आषाढीपूर्वी तीन दिवस चंद्रभागा नदीपात्रात पोहोचणार असल्याने भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नानाचा लाभ मिळणार आहे.
Ashadhi Ekadashi 2026: चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या
यंदाच्या आषाढी वारीत ३० ते ३२ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी वाळवंटात चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, तात्पुरती शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात येत आहे. दर्शन रांगेसाठी नव्या शेडची उभारणीही सुरू असून, भाविकांना वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे आणि पिण्याचे पाणी सहज उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री गोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.






