फोटो सौैजन्य: Chat GPT
नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे.त्या कामात सध्या रस्त्यावरील जुना डांबरी रस्ता खोदून टाकला जात आहे.या रस्त्याच्या बाजूला नेरळ विद्या भवन शाळा असून त्या शाळेची जलवाहिनी रस्त्याच्या कडेने पुढे जाते.त्या रस्त्याच्या कामात 3 फेब्रुवारी रोजी रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जेसीबी मशीनने तोडले आणि नंतर ती जलवाहिनी जोडण्यात आली नाही.त्याचा परिमाण या शाळेतील 200 विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आपल्या घरातून आणावे लागते. या शाळेत जाणारी जलवाहिनी तुटल्याने या शाळेत तीन फेब्रुवारी पासून कोल्हारे ग्रामपंचायत चे पाणी आलेले नाही.त्याबद्दल या शाळेचे शिक्षकांनी कोल्हारे ग्रामपंचायत तसेच कर्जत तहसीलदार आणि कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे.मात्र मागील 20 दिवसात रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यांच्याकडून जलवाहिनी दुरुस्त करण्याचे कार्य देखील ठेकेदाराने केले नाही.
शाळेतील विद्यार्थ्यांचे कोणतेही म्हणणे नेरळ कळंब रस्त्याचे काम करणारा ठेकेदार करीत नसल्याने शाळा व्यवस्थापन आक्रमक झाले आहे.आज शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या समोरून जाणाऱ्या ट्रॅक अडवून ठेवल्या असून रस्त्याने काम देखील अडविण्याचा इशारा दिला आहे.शाळेचे शिक्षक सचिन अभंगे आणि संतोष कांबरी यांनी शाळेचे वतीने दोन दिवसांचा इशारा देण्यात आला आहे.दोन दिवसात शाळेची जलवाहिनी नव्याने टाकण्यात आली नाही तर शाळेचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग हे सर्व नेरळ कळंब रस्ता अडवून ठेवणार आहेत.






