या उपक्रमाअंतर्गत एकूण 146 विद्यार्थ्यांना वह्या व पेन, तर 121 महिलांना साडी व सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. कसणी येथे 31 विद्यार्थी व 33 महिला, कोकीसरे गवळीनगर येथे 37 विद्यार्थी व 38 महिला, तर खोदलापूर येथे 78 विद्यार्थी व 65 महिलांना लाभदेण्यात आला.
सात ते आठ किलोमीटर विद्यार्थ्यांना शाळेसाठी करावी लागते पायपीट
काकडे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र आजही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी सात ते आठ किलोमीटर पायपीट करावी लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका, पावसाळ्यात ओढ्यांना येणारे पूर, तसेच आरोग्यसेवांचा अभाव यामुळे अनेकदा जीवितहानी होते. या भीतीमुळे अनेक मुले शाळेत जाणेच बंद करतात, अशी खत्त त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधांबाबत जनजागृती व्हावी
डोंगर-दऱ्यांच्या भागात शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास धुळाजी यमकर, बापू जानकर, धाकलू गावडे, पोलीस पाटील सुनिता गावडे, अजित कांबळे, महादू कोडार, कोयल गावडे, लक्ष्मण कोकरे, संतोष कोकरे, रायबा माने, सिताराम जानकर, चौडीबा शेळके, विठ्ठल माणेरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व महिला उपस्थित होत्या.






