कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत करवीर, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा व कागल या तालुक्यातून यंदा गूळ रव्यांची आवक झाली आहे.यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने समाधानकारक राहिल्यामुळे ऊस उत्पादनावर सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे गुऱ्हाळ हंगाम वेळेत सुरू झाला आणि तो सातत्याने सुरू राहिला. परिणामी गुळाचा पुरवठा नियमित राहिला. स्थानिक बाजारासह राज्यातील विविध भागांतून तसेच काही प्रमाणात, परराज्यातूनही कोल्हापूरच्या गुळाला मागणी असल्याचे चित्र आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशसह आखाती देशात कोल्हापूरचा गूळ पाठविला जातो.
गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, वाढलेली आवक असूनही दर स्थिर राहणे आणि किंचित वाढ होणे ही बाब दिलासादायक आहे. उत्पादन खर्च वाढत असताना मिळणारा दर काहीसा आधार देणारा ठरत आहे. मात्र, वाहतूक खर्च, मजुरी आणि इंधन दर वाढ याचा परिणाम नफ्यावर होत असल्याचीही शेतकऱ्यांची भावना आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत करवीर, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा व कागल या तालुक्यातून यंदा गूळ रव्यांची आवक झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने समाधानकारक राहिल्यामुळे ऊस उत्पादनावर सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे गुऱ्हाळ हंगाम वेळेत सुरू झाला आणि तो सातत्याने सुरू राहिला. परिणामी गुळाचा पुरवठा नियमित राहिला. स्थानिक बाजारासह राज्यातील विविध भागांतून तसेच काही प्रमाणात परराज्यातूनही कोल्हापूरच्या गुळाला मागणी असल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत करवीर, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा व कागल या तालुक्यातून यंदा गूळ रव्यांची आवक झाली आहे.यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने समाधानकारक राहिल्यामुळे ऊस उत्पादनावर सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे गुऱ्हाळ हंगाम वेळेत सुरू झाला आणि तो सातत्याने सुरू राहिला. परिणामी गुळाचा पुरवठा नियमित। राहिला. स्थानिक बाजारासह राज्यातील विविध भागांतून तसेच काही प्रमाणात, परराज्यातूनही कोल्हापूरच्या गुळाला मागणी असल्याचे चित्र आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशसह आखाती देशात कोल्हापूरचा गूळ पाठविला जातो.गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, वाढलेली आवक असूनही दर स्थिर राहणे आणि किंचित वाढ होणे ही बाब दिलासादायक आहे. उत्पादन खर्च वाढत असताना मिळणारा दर काहीसा आधार देणारा ठरत आहे. मात्र, वाहतूक खर्च, मजुरी आणि इंधन दर वाढ याचा परिणाम नफ्यावर होत असल्याचीही शेतकऱ्यांची भावना आहे.
दराच्या बाबतीतही यंदाचा हंगाम मागील वर्षापेक्षा काहीसा चांगला ठरला आहे. गतवर्षी गुळाचा सरासरी दर सुमारे 4 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका होता. यंदा त्यात वाढ होऊन सरासरी दर4,100 रुपये इतका राहिला आहे. दर्जेदार गुळाला याहून अधिक दरही मिळाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः रंग, चव आणि घट्टपणा चांगला असलेल्या गुळाला बाजारात चांगली मागणी आहे.






