जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच
अखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या लाँग मार्चदरम्यान शेतकरी आणि कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सरकारशी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांसमोर झाली.
या बैठकीत प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र सरकारने केवळ तोंडी आश्वासन न देता लेखी स्वरूपात निर्णय जाहीर करावा, अशी ठाम भूमिका किसान सभेने घेतली आहे. सरकारकडून मागण्यांबाबत अधिकृत लेखी निर्णय मिळेपर्यंत लाँग मार्च सुरूच ठेवला जाईल, असा इशारा किसान सभेचे राष्ट्रीय सचिव डॉ. अजित नवले यांनी दिला.
Ahilyanagar News: अहिल्यानगर महापालिकेत सहापैकी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड, शिवसेनेचा अर्ज रद्द
किसान सभा आणि CITU यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला लाँग मार्च बुधवारी (दि. २५) सायंकाळी संगमनेर येथे दाखल झाला. त्यानंतर २६ तारखेला दुपारी हा मोर्चा लोणीच्या दिशेने रवाना झाला. या मोर्चात किसान सभेचे राज्याध्यक्ष Umesh Deshmukh, उद्धव पौळ, दीपक लिपने, अमोल वाघमारे, जितेंद्र चोपडे, धर्मा शिंदे, अशोक थोरात यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. अजित नवले यांनी Pune Nashik Railway Project संदर्भातही प्रश्न उपस्थित केला. या प्रकल्पाबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली. महिलांच्या वेतनवाढीसाठी शासनाकडून विलंब केला जात असताना रेल्वे सर्व्हेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी, अशीही मागणी करण्यात आली.






