भक्तीच्या भूमीत शक्तीचं नवं केंद्र; शिर्डीत उभारलं देशातील सर्वात मोठं प्रायव्हेट डिफेन्स क्लस्टर
पुणेकरांसाठी खुशखबर! आता मेट्रोची तिकिटे मिळणार ‘या’ App वर; रांगेत उभा राहण्याची कटकट मिटली
या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाहणी दौऱ्यावेळी देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संरक्षण मंत्रालय आणि राज्य शासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भक्तीच्या भूमीत आता ‘संरक्षण शक्तीचे’ हे नवे केंद्र देशाच्या अभिमानाचा विषय ठरत आहे.
शिर्डीतील या अत्याधुनिक आणि भव्य डिफेन्स क्लस्टरमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भारतीय लष्कराला अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी या प्रकल्पात खालील प्रमुख घटकांची निर्मिती केली जाणार आहे..
अत्याधुनिक क्षेपणास्त्रे: क्षेपणास्त्रांची अत्याधुनिक डिझाईन आणि थेट निर्मिती येथे केली जाईल.
भव्य दारुगोळा पार्क: लष्करासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या दारुगोळ्याचे एक विशाल पार्क या अंतर्गत विकसित केले आहे.
आधुनिक ड्रोन्स: युद्धाच्या काळात देखरेख ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी उपयुक्त ठरणारे हाय-टेक ड्रोन्स येथे बनवले जातील.
युद्धभूमीवरील साधने: प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैनिकांचे रक्षण करणारी आणि शत्रूवर मात करणारी अत्याधुनिक संरक्षण साधने या प्रकल्पात उत्पादित केली जाणार आहेत.
हजारो कोटींची गुंतवणूक आणि रोजगाराची मोठी संधी- या मेगा प्रोजेक्टसाठी खाजगी क्षेत्राकडून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे केवळ देशाची सीमाच सुरक्षित होणार नाही, तर महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला कच्च्या मालाचा पुरवठा आणि इतर सेवांच्या माध्यमातून मोठी चालना मिळेल. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या आणि कौशल्याच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक प्रगतीत एक ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे.
जागतिक नकाशावर शिर्डीचे नाव आतापर्यंत भारताला अनेक अत्याधुनिक संरक्षण साधनांसाठी परकीय देशांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, शिर्डीतील हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर भारताचे परदेशांवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होणार असून, भारत संरक्षण साहित्याचा मोठा उत्पादक देश म्हणून समोर येईल. साईनगरी शिर्डी आता केवळ धार्मिक पर्यटनासाठीच नाही, तर जागतिक संरक्षण उत्पादन नकाशावर एक प्रमुख केंद्र म्हणून ठळकपणे उदयास येणार आहे, असा विश्वास या पाहणी दौऱ्यादरम्यान व्यक्त करण्यात आला.






