संग्रहित फोटो
पुण्यात देखील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील स्थिती पाहता फायरच्या उपाययोजना तसेच बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्याचे दिसते. अनेक बार तर पार्किंगच्या व्यवस्था तसेच मार्गदर्शक सूचनांना फाटा देऊन चालविले जात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आता पोलिस व अग्निशमन दलाकडून पाहणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
‘शहरातील पब, रेस्टॉरंट, बारमध्ये प्रवेश करण्यासाठी तसेच बाहेर पडण्यासाठी असलेल्या मार्गांची पाहणी करणे गरजेचे आहे. आग किंवा एखादी अनुचित घटना घडल्यास ग्राहकांना त्वरित बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पब, रेस्टॉरंट, बारमधील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित आहे का नाही, याची पाहणी करणे गरजेचे आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास त्वरित केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत पब, रेस्टॉरंट, बारचालकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत मदतकार्य सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षित करायला हवे. यानिमित्ताने येथील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही अग्निशमन दलाकडून दिले जाईल. आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सराव तसेच कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणेही गरजेचे आहे.’, असे पोटफोडे यांनी नमूद केले.
गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पब, रेस्टॉरंट चालकांनी सुरक्षाविषयक उपाययोजनांची पाहणी करणे गरजेचे आहे. अनुचित प्रकार घडल्यास त्वरित बाहेर पडण्यासाठी ग्राहकांना मार्ग उपलब्ध करून द्यायला हवा. – सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार






