संग्रहित फोटो
पुणे : आज माझा भाऊ नाही. जे काही माझ्या आणि माझ्या भावाच्या मध्ये झाले. माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता सगळ्यांना माहित आहे. माझा दादा नाही हे दुःख आयुष्यभर माझ्या मनात राहील त्यामुळे कश्याला खरं खोटं करत बसायचे, जे खरे आहे ते माझ्या भावात आणि माझ्यात झाले आहे. आता काम करणे हीच दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बाबत चर्चा सुरू झाली असून, याबाबत विचारले असता सुळे यांनी सदर उत्तर दिले. ‘‘दर दोन महिन्यांनी मी महापालिका तसेच जिल्हा परिषद येथे बैठक घेत असते. मतदार संघातील विकासकामाबाबत माहिती घेते. छोटासा आढावा आज आम्ही घेतलाय. पाण्याचा प्रश्न असेल आणि इतर प्रश्नांच्या बाबत चर्चा झाली. तसेच गुडलक चौक येथील कलाकार कट्टा काढू नका अशी विनंती आज केली असून, त्यांनी शब्द दिलाय की काढत नाही. तसेच शहरातील पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. जलसंपदाने पत्र दिले आहे. काही निधी देण्याचे बाकी आहे त्यावर चर्चा झाली. विकासकामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत तसेच रिंग रोड देखील वेळेत पूर्ण व्हायला हवा. जलसंपदा – महापालिकेच्या वादाबद्दल मी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे आणि मुख्यमंत्री यांनी यातून मार्ग काढला पाहिजे, असं यावेळी सुळे म्हणाल्या.
काँग्रेस भवन येथे झालेल्या दगडफेकीच्या बाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, जी पुण्यात घटना झाली ती दुर्दैवी आहे. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वाना आहे मात्र शांततेच्या मार्गने झाले पाहिजे. जी काही कटुता येत आहे ती सशक्त लोकशाहीसाठी घातक असल्याचं यावेळी त्यांनी सांगितल.
भिगवन येथील घटनेबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, मी या संदर्भात पोलिस अधीक्षक यांच्याशी बोलले आहे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी देखील बोलणं झालं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की शांतता राहिली पाहिजे. याबाबत योग्य तपास सुरू आहे. हा विषय वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अस यावेळी सुळे म्हणाल्या.
आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकारिषदेत जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, एकतर रोहितची अस्वस्थता साहजिक आहे. दादा हा त्याचा काका होता. आज समाजातील सगळेच अस्वस्थ आहेत. सगळ्यांना उत्तर हव आहे. रोहित उत्तर शोधत आहे. आमच्या घरात जे झालं ते कोणाच्याही घरात होऊ नये. या सगळ्या अपघाताची इन्क्वायरी पारदर्शकपणे झाली पाहिजे. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल. तसेच ब्लॅक बॉक्स मधली माहिती टेक्निकली असून, ती मिळेल तसेच अपघाताच्या बाबत जे काही रोज नवीन माहिती समोर येत आहे त्यामुळे सगळ्यांच्या समोर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, अस यावेळी त्या म्हणाल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्यसभेची टर्म संपत असून, याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, आम्ही महाविकास आघाडीचे नेते आठ दिवसात बसून याबाबत निर्णय घेऊ, अस यावेळी त्या म्हणाल्या.






