महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेखचा ‘रुस्तुम-ए-हिंद’ किताब बेकायदशीर; कुस्ती महासंघाचा कडक कारवाईचा इशारा
पुणे : महाराष्ट्राचा नामांकित मल्ल सिकंदर शेखने देशातील मानाची स्पर्धा जिंकत ‘रुस्तुम-ए-हिंद’ हा मानाचा किताब पटकावला आहे. अनेकवेळा त्याला यशाने हुलकावणी दिल्यानंतर त्याचे हे यश त्याच्या चाहत्यांसाठी आनंद घेऊन आले आहे. या रुस्तुम-ए-हिंद या किताबावर नेहमीच उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. त्यात केवळ पै. हरीशचंद्र बिराजदार, अमोल बुचडे आणि असाब अहमद यांनीच हा किताब जिंकल्याचे सांगितले जाते. त्यांच्यानंतर आता सिकंदर शेख हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा मल्ल ठरला आहे.
देशातील अनेक नामवंत मल्लांचा या स्पर्धेत सहभाग
पंजाबमधील जांडला जि. जालंधर येथे 2024 च्या रुस्तुम-ए-हिंद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशातील अनेक नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यांना धूळ चारत सिकंदर शेख याने रुस्तुम-ए-हिंद हा किताब पटकविला. या स्पर्धेत सिकंदर च्या रोशन किरलगड आणि बग्गा कोहली यांच्यासोबत झालेल्या कुस्त्या रोमहर्षक आणि पाहण्यासारख्या होत्या. अंतिम स्पर्धेत सिकंदर विरूध्द बग्गा कोहली यांच्यात कुस्ती झाली यात सिकंदर विजयी झाला. त्याला बक्षीस म्हणून मानाची गदा, ट्रॅक्टर या बक्षिसाबरोबरच आर्थिक स्वरूपातही बक्षीस मिळाले आहे.
गतवर्षी म्हणजे २०२३ ला सिकंदर शेख याने ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती जिंकून ६६ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला होता. त्याच्या कुस्तीमधील पुढील करिअरसाठी पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’ने सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि सिकंदर शेख यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या मदतीच्या आधारे शेख याची विविध कुस्ती स्पर्धांत भाग घेण्याची आणि त्यात विजय मिळविण्याची घौडदौड जोमाने सुरू असून त्यात आणखी एका मोलाच्या विजयाची भर पडली आहे. या विजयाबद्दल ‘पुनीत बालन ग्रुप’कडून अभिनंदन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र केसरीचा किताब हुकला
साल 2023 साली झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिंकदर शेखवर अन्याय झाल्याचे बोलले जात होते. कोथरूड परिसरात झालेल्या ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शेवटच्या दिवशी (दि. १४ जानेवारी 2023) महाराष्ट्र केसरी गटातील अंतिम फेरीमध्ये सिंकदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. या लढतीसाठी पंच मारूती सातव हे होते. दरम्यान, यातील एका डावात पंच सातव यांनी महेंद्र गायकवाड यांना ४ गुण दिले होते.
अंतिम फेरीत य़श हुकल्यानंतर मोठा वाद
त्यानंतर, सिंकदर शेखच्या प्रशिक्षकांनी या गुणाबाबत ज्युरीकडे (थर्ड पंच) दाद मागितली. त्यात थर्ड पंच असणारे दिनेश गुंड, नवनाथ ढमाळ व अंकुश वरखडे यांनी या डावाचा व्हिडिओ पाहून सिंकदर शेख यांना एक व महेंद्र गायकवाड यांना चार गुण दिले. या कुस्तीत सिंकदर शेख यांचा पराभव झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा मान त्यांच्याकडून हिसकावला गेला होता. असे त्याच्या चाहत्यांचे मत होते, यावरून मोठा गदारोळसुद्धा झाला होता परंतु त्यानंतर सिंकदर शेखने आपले कौशल्य दाखवत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला.
‘सिंकंदर शेख हा एक गुणवान खेळाडू आहे. त्याने रुस्तम-ए-हिंद किताब जिंकून आपल्या महाराष्ट्राचं नाव देशपातळीवर गाजवलं. भविष्यात शेख कुस्तीच्या माध्यमातून जगभरात महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव तो उंचावेल अशी खात्री आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’कडे असे गुणवंत खेळाडू आहेत, ही आमच्यासाठी आणखी आंनदाची आणि अभिमानाची बाब आहे. शेख याने मिळविलेल्या यशामुळे आणखी प्रतिभावान खेळाडूंच्या मागे उभं राहण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली.” – पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप
हेही वाचा : WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासह 5 देशांमध्ये स्पर्धा! टीम इंडियाचं फायनलमध्ये जाणं झालं कठीण






