(फोटो सौजन्य: Pinterest)
आपली ट्रेन चुकू नये म्हणून अनेक प्रवासी रुळ ओलांडण्याचा धोका पत्करतात, तर काही जण भरगच्च गाड्यांमध्ये दरवाज्याला लटकून प्रवास करतात. ठाणे स्थानक परिसरात घडणाऱ्या अपघातांपैकी बहुतेक घटना रुळ ओलांडताना किंवा धावत्या गाडीतून पडल्यामुळे घडल्या आहेत. २०२५ मध्ये रुळ ओलांडताना १२५ पुरुष आणि १९ महिलांचा मृत्यू झाला, तर धावत्या लोकलमधून पडून ६० पुरुष आणि ६ महिलांनी जीव गमावला. २०२२ ते २०२५ या काळात मृत्यूंचे प्रमाण वाढत असतानाही ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडल्याची टीका होत आहे.
कळवा-ऐरोली उन्नत मार्गिका प्रकल्प
ठाणे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी २०१६ मध्ये कळवा-ऐरोली उन्नत मार्गिका प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पामुळे कल्याणहून थेट ऐरोलीपर्यंत लोकल सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र प्रकल्प पूर्ण होण्याची निश्चित वेळ अद्याप जाहीर झालेली नाही. परिणामी, ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवासासाठी प्रवाशांना ठाणे स्थानकावरच अवलंबून राहावे लागते.
रेल्वे पोलिसांची भूमिका
स्थानक परिसरातील अनधिकृत चोरवाटा बंद करणे, रुळ ओलांडण्यावर नियंत्रण ठेवणे आणि लोकल वेळेत धावण्याबाबत रेल्वे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दल व मध्य रेल्वेला पत्रे पाठवली आहेत. तरीही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा दिसून आलेली नाही.
नवे ठाणे स्थानक
२०१७ मध्ये ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाची घोषणा करण्यात आली होती. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र अनेक वर्षे उलटूनही ते सुरू झालेले नाही, त्यामुळे विद्यमान ठाणे स्थानकावरील गर्दी कायम आहे.
Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..
स्थानक पुनर्विकास योजना
आरएलडीए आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्थानकाचे मल्टी-मोडल ट्रान्झिट हबमध्ये रूपांतर करण्याची योजना आहे. या प्रकल्पात व्यापारी संकुल आणि हेलिपॅडचाही समावेश आहे. मात्र या पुनर्विकासाचे काम कधी पूर्ण होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






