(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता इमरान खान हा त्याच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यासाठी आणि त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखला जातो. तो अलिकडेच “हॅपी पटेल: डेंजरस डिटेक्टिव्ह” या चित्रपटात दिसला. दरम्यान, सलमान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. 90 च्या दशकापासून सलमान – शाहरूख आणि आमिरची क्रेझ काही कमी झालेली नाही. ते बॉलिवडूचे एव्हरग्रीन सुपस्टार असून ते अजूनही प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत असतात. पण या तिघांबद्दल इमरान खानने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करण्याची वेळ आता आली आहे असे इमरान मत आहे.
शोशाला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत अभिनेता इम्रान खान म्हणाला, ”वयानुसार भूमिकाही बदलत जातात. काही वर्ष तुम्ही मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारता. पण मग तुम्ही वयाच्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचता तेव्हा तुम्ही लीड रोल साकारण्यासाठी सक्षम नसता.तिन्ही खानचं वय आता 60 वर्षांपेक्षा जास्त आहे.त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ स्टारडम अनुभवलं आहे. ”
पुढे तो म्हणाला, ”याची कल्पना करणे किंवा जुळवणे कठीण आहे. मला वाटते की हे नैसर्गिक आहे, कोणत्याही अभिनेत्याच्या प्रवासाचा एक आवश्यक भाग आहे, की जसजसे तुम्ही मोठे होता तसतसे तुम्ही साकारत असलेल्या भूमिका बदलतात.आणि तुमचं स्टारडमही बदलते. कारण तुम्हाला मानणार आणि तुमच्यासोबत मोठा होणारा एक प्रेक्षकवर्गही असतो. त्यानंतर एक नवी पिढी येते. ते त्यांच्या अनुभवानुसार आणि वयाप्रमाणे जे जवळचे वाटतात त्यांना जोडली जाते. जेव्हा पण आपण सिनेमे बघतो तेव्हा त्या कथेच्या हिरोमध्ये आपण स्वत:ला पाहतो. त्यामुळे युवा पिढीला 70 वर्षांच्या व्यक्तीला पाहण्यात इंटरेस्ट नसू शकतो.”






