फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुनीता आहुजा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. सुनीता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, तिच्या बेधडक विधानांमुळे! सुनिताने चक्क लग्नाच्या इतक्या वर्षानंतर “मला गोविंदासारखा मुलगा चालेल पण पती नाही!” असे वक्तव्य केले आहे. तसेच या विधानामागचे कारणही तिने स्पष्ट केले आहे.
सुनीताने एका मुलाखतीदरम्यान गोविंदा उत्तम मुलगा आणि भाऊ आहेत असे सांगितले, परंतु पती म्हणून तिच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत असे तिचे मत आहे. याविषयी सांगताना सुनीताने कारणही स्पष्ट केले आहे. तिचे म्हणणे आहे की तिला पार्टी करायला आवडते, बाहेर डिनरला जायला आवडतं तसेच सुट्ट्यांमध्ये इथेतिथे फिरून एन्जॉय करायला आवडतं. पण गोविंदाने संपूर्ण आयुष्यभर कुटुंबाची फक्त सेवाच केली आहे. स्वतःसाठी एक मिनिटही वेळ काढला नाही. सुनीताचे म्हणे आहे की गोविंदाने व्यक्ती म्हणून आयुष्यत बरंच काही कमावलं पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याने काहीच कमावले नाही, वैयक्तिक आयुष्याचा त्याने काहीच आनंद घेतला नाही.
मुळात, सुनीताने आधीही स्पष्ट केले होती की तिला गोविंदासारखा मुलगा हवा पण पती म्हणून गोविंदा नको. त्यामुळे गोविंदाच्या अनेक चाहत्यांनी भुवया उंचावल्या होत्या, परंतु सुनीताने त्यामागचे कारण स्पष्ट केल्यावर तिच्या म्हणण्यामागचा खरा पैलू समजला. ती म्हणते की, “आता गोविंदा 60 वर्षांचा झाला आहे. या आयुष्यात त्या माणसाने कधीच स्वतःसाठी आयुष्य जगले नाही. मला खरंच फार वाईट वाटत त्याच्याकडे बघून की इतका मोठा सुपरस्टार असूनही या माणसाने काहीच आयुष्य अनुभवले नाही.”
1987 साली गोविंदा आणि सुनीताचे लग्न झाले. आपल्या अभिनय कामावर परिणाम होऊ नये म्हणून काही काळासाठी गोविंदाने त्याचे वैवाहिक आयुष्य गुपित ठेवले पण जेव्हा ते समोर आले तेव्हापासून हे बॉलिवूडचे जोडपे नेहमीच चर्चेत राहिले. या मुलाखतीत सुनीता म्हणते की, “गेल्या 40 वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे आता आम्हाला वेगळं होण्याचा विचारही करता येत नाही.” ती म्हणते की आता पश्चात्तापही करू शकत नाही.
गोविंदा यांनी आपल्या अभिनय, नृत्यशैली आणि कॉमिक टाइमिंगमुळे मोठे यश मिळवले असून त्यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा आहे. सुनीता आहुजा यांनी त्यांच्या कारकिर्दीत कायम पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे वैयक्तिक आयुष्याबाबत नवी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर काहींनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले, तर काहींनी टीका केली. या प्रकरणातून सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्यही गुंतागुंतीचे असल्याचे दिसून आले. नात्यांतील अपेक्षा आणि वास्तव यावर पुन्हा विचार करण्याची संधी या चर्चेमुळे मिळाली.






