अनेक वर्षाच्या संघर्षानंतर मंजूर झालेल्या साकळाई सिंचन योजनेला आता सुरू होण्यापूर्वीच वादाचे ग्रहण लागले आहे. घोड धरणावरून प्रस्तावित साकळाई योजना राबविण्याच्या विरोधात आज घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी नगर-दौंड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली श्रीगोंदे व नगर तालुक्यातील ३२ गावांना वरदान ठरणारी ही योजना असून, यासाठी १२३८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. घोड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार साकळाई योजना पूर्वी विसापूर धरणातून नियोजित होती. परंतु तेथील रद्द करून ती आमच्या हक्काच्या घोड धरणातून मंजूर झाली. त्यामुळे घोड पट्टयातील शेतकरी उद्धवस्त होतील, घोड धरण जुने व मातीचे आहे.
सिंगल चार्जवर 630 किमी रेंज अन् 9 मिनिटात फुल चार्ज! BYD ने सादर केली नवीन Electric Car
त्यामुळे त्याची उंची वाढवणे अथवा गाळ काढून खोली वाढवणे शक्य नाही. तसेच हे धरण कुकडी प्रकल्पाच्या अगोदरचे आहे. वरील भागात कुकडी प्रकल्पातील विविध धरणे उभारल्याने घोड धरणाच्या लाभक्षेत्रातील पाणी कमी झालेले आहे. कुकडी योजनेतून डिबे-माणिक डोह बोगदा करून आमच्या वाटेचे पाणी प्रथम आम्हाला देण्यात यावे. ही योजना घोड ऐवजी विसापूर धरणावरून राबविण्यात यावी. विसापूर धरणाची उंची व खोली वाढवणे शक्य आहे. कुकडी प्रकल्पातून विसापूर धरणात पाणी सोडता येते. साकळाई व विसापूर अंत्तर देखील कमी आहे.






