(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मालिका इंडस्ट्रीमध्ये नेहमीच काम करणाऱ्या कलाकारांना वेळेवर मानधन न मिळणं, मानधन थकवने, सेटवर काळजी न घेणे, फसवणूक अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आणि यामुळे अनेक कलाकार अचानक मालिकाच निरोप घेतात आणि बाहेर पडतात. ‘पारू’ या मालिकेतील अभिनेता शंतनू गंगणेनं नुकताच याप्रकरणी आवाज उठवला होता. अशातच आता स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील ‘आई बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतील अभिनेता आदिश वैद्यने मालिका सोडल्याचे समजले आहे. आदिश मालिकेत दिसत नसल्याने त्याचे चाहते चिंता व्यक्त करू लागले. अखेर अभिनेत्याने याचे कारण स्पष्ट केले आहे. आदिश वैद्यचे वडील एका गंभीर आजाराला लढा देत आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच वडील ॲडमिट असताना अभिनेत्याला सेट सोडलास तर बघ अशा धमक्या, शिवीगाळ ते अंगावर धावून आल्याचे त्याने सांगितले.
Bigg Boss 19: ‘बिग बॉस १९’ मध्ये फरहाना भट्टची संपली कॅप्टन्सी, आता ‘हा’ स्पर्धक चालवणार घराची सत्ता
सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आदिश वैद्य म्हणाला, “एका अभिनेत्याचं आयुष्य अजिबात सोपं नसतं. फक्त अभिनय नव्हे तर अनेक गोष्टी एक नट म्हणून हँडल कराव्या लागतात. अभिनेत्यांना सहज टार्गेट केलं जातं. एखाद्या मालिकेतून माघार हे एका अभिनेत्यासाठी किंवा माझ्यासाठी सोपं अजिबात नाही. पण मला काही निर्णय घ्यावे लागले. कारण ते गरजेचे होते. कारण माझ्या आयुष्यात आता १० वर्षांच्या करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात एक अशी घटना घडली होती जी कधीच कोणासोबत घडू नये. माझे एक हिंदी आणि एक मराठी असे दोन शो सुरू होते. माझं माझ्या कामावर प्रचंड प्रेम आहे. १० वर्षात मी कष्टाने कमावलं आहे साग सगळं”.
आदिश पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्हाला ऑन सेट आरडाओरडा, शिव्यागाळ किंवा वर्बली फिजीकली जर कोणी अटॅक करत असेल तर ते तुमच्या सेल्फ रिस्पेक्टवर येतं. कारण ही गोष्ट मी एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून कधीच फेस केली नाही. माझ्या करिअरमध्ये मला खूप चांगले लोक भेटले आहेत. प्रेमाने काम करणारे लोक मला भेटले. मी दुसऱ्यांच्या स्वभावाची काळजी घेतो आणि स्वत:च्याही घेतो. दोन मालिका करत असल्याने कधी या सेटवर कधी त्या सेटवर जावं लागत होतं. सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत मी दोन्ही मालिकांसाठी शूट करत होतो. पण प्रोडक्शनमधल्या एका वैयक्तिने या गोष्टीचं प्रेशर घेतल्यामुळे त्याचे इगो क्लॅश माझ्यासोबत झाले. दोन्ही मालिका एकत्र करणार याच टर्मवर त्यांनी मला घेतलं होतं. दोन्ही सेटवर वेळेत पोहोचायला मी खूप कष्ट केले आहेत”.
आदिश शेवटी म्हणाला, एखाद्याचं प्रेशर त्याला हँडल होत नाही आहे. म्हणून जर तो एखाद्या ॲक्टरला किंवा मला सांगणार असेल की मी सांगेल तोवर सेट सोडून जायचं नाही आणि गेलास तर मी बघेन काय करायचं वगैरे. तिथे मी हेच उत्तर दिलं होतं की माझे वडील लिलावतीमध्ये ॲडमिट होते. अजूनही त्यांचे उपचार सुरू आहेत. एका दिवशी तीन तासांसाठी मला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं. त्यामुळे एक दिवस आधी मी त्या माणसाला सांगितलं होतं की मला उद्या तीन तासांसाठी जावं लागेल. नंतर शिफ्ट एक्सटेंड करायलाही मी तयार होतो. पण आता मी बघतोच तू कसा जातो? असं त्या संबंधित वैयक्तिचं वागणं होतं. आपल्या इंडस्ट्रीत अंगावर धावून येणं हे कुठे घडतं? याप्रकरणी चॅनलसोबत सध्या माझं बोलणं असल्याचं, आदिश वैद्य म्हणाला आहे.
आदिश वैद्य हा मराठीमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी चित्रपट, मराठी मालिका आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘झिंगदी नॉट आईट’, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘सवी की सवारी’, ‘पुष्पा इम्पॉसिबल’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘बॅरिस्टर बहू’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करून त्याने प्रसिद्धी मिळवली आहे.