श्रावण महिना चालू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा करून इच्छित फळ प्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते. याशिवाय महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवास केल्यानंतर सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी दुपारच्या जेवणापर्यंत अतिशय कमी आणि ठराविक पदार्थांचे सेवन केले जाते. पण काहींना उपवास केल्यानंतर सुद्धा भूक आवरत नाही. सतत काहींना काही खाण्याची इच्छा होते. जास्त खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढतील अशी भीती अनेकांच्या मनात असते. पण उपवासाच्या दिवशी कोणतेही गिल्ट न ठेवता तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. (फोटो सौजन्य – istock)
उपवासाच्या दिवशी भूक कंट्रोल होत नाही? मग आवर्जून करा 'या' पदार्थांचा नाश्त्यात समावेश, गोड पौष्टिक पदार्थ

उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाण्याऐवजी रताळं खावं. रताळ्यात असलेल्या गुणकारी घटकांमुळे आरोग्य सुधारण्यासोबतच दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

शेंगदाण्याचे लाडू किंवा चिक्की खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. गुळाचा वापर करून बनवले जाणारे पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहेत.

उपवासाच्या दिवशी मखाणा खाणे अतिशय उत्तम पर्याय आहे. तुपात भाजलेले मखाणा किंवा मखाण्याची खीर बनवून सुद्धा खाऊ शकता. यामुळे शरीराला फायदे होतात.

उपवासाच्या दिवशी ताज्या फळांचा समावेश करावा. फळे खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते.

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात सुका मेवा आणि दुधाचा वापर करून बनवलेली स्मूदी प्यावी. स्मूदी प्यायल्यामुळे पोट भरलेले राहते.






