लातूर शहरात मागील तीन महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक 16 येथील एका खड्ड्यांमध्ये दोन बालकाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक गिरीश पाटील नगरसेविका राजश्री धोत्रे प्रभागातील नागरिकांनी मनपात आंदोलन करत या दोन चिमुकल्याच्या मृत्यूला मनपातील क्षेत्रीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्या परिवाराला आर्थिक मदत झाली पाहिजे यासाठी आंदोलन केल्यानंतर लातूर शहराच्या महापौर जयश्री सोनकांबळे व तत्कालीन मनपायुक्त मानसी मीरा यांनी येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये कांबळे परिवाराला आर्थिक मदत करण्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन त्या परिवाराला मदत केली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु अजिंठा तयार झाल्यानंतर हा विषय सर्वसाधारण सभेच्या विषयांमध्ये घेत घेतला नसल्याने नगरसेवक गिरीश पाटील हे आक्रमक होतं जोपर्यंत या परिवाराला आर्थिक मदत होणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच असेल व येणाऱ्या सर्व साधारण सभेमध्ये हा विषय घेतला नसल्यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार असा पवित्रा प्रभाग क्रमांक 16 मधील नगरसेवक गिरीश पाटील व नगरसेविका राजश्री धोत्रे यांनी घेतला आहे.अनेक दिवसापासून शहरातील खड्डे, स्वच्छता ,पिण्याचे पाणी या महत्वपूर्ण विषय प्रलंबित असताना लातूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना शहरातील खड्ड्यामुळे ना हरकत त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या खड्ड्यामुळे शहरातील काही नागरिकांनी आपला जीव गमावला असून. खड्ड्याच्या अपघातामुळे अनेक जण गंभीर जखमी झाली असून या महत्त्वपूर्ण विषयाकडे सत्ताधारी व मनपा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक गिरीश पाटील यांनी केला. तसेच शहरातील मोकाट श्वानाच्या विषयावर अनेक आंदोलन करून देखील एका युवकाला चावल्याने मृत्यू झाल्यानंतर मनपा प्रशासनाने पुन्हा हालचाली करून ही मोहीम अधिक वेगवान सुरू करण्याचा प्रयत्न केले. तसेच शहरातील स्वच्छतेचा विषय ऐरणीवर असून यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप देखील नगरसेवक गिरीश पाटील यांनी व्यक्त केला. या सर्व साधारण सभेचा अजेंडा हा आमदार अमित देशमुख यांच्या काढण्यात आल्याचा आरोप नगरसेवक गिरीश पाटील व नगरसेविका राजश्री धोत्रे यांनी नवराष्ट्र शी बातचीत करताना व्यक्त केला आहे.
लातूर शहरात मागील तीन महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक 16 येथील एका खड्ड्यांमध्ये दोन बालकाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक गिरीश पाटील नगरसेविका राजश्री धोत्रे प्रभागातील नागरिकांनी मनपात आंदोलन करत या दोन चिमुकल्याच्या मृत्यूला मनपातील क्षेत्रीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्या परिवाराला आर्थिक मदत झाली पाहिजे यासाठी आंदोलन केल्यानंतर लातूर शहराच्या महापौर जयश्री सोनकांबळे व तत्कालीन मनपायुक्त मानसी मीरा यांनी येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये कांबळे परिवाराला आर्थिक मदत करण्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन त्या परिवाराला मदत केली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु अजिंठा तयार झाल्यानंतर हा विषय सर्वसाधारण सभेच्या विषयांमध्ये घेत घेतला नसल्याने नगरसेवक गिरीश पाटील हे आक्रमक होतं जोपर्यंत या परिवाराला आर्थिक मदत होणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच असेल व येणाऱ्या सर्व साधारण सभेमध्ये हा विषय घेतला नसल्यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार असा पवित्रा प्रभाग क्रमांक 16 मधील नगरसेवक गिरीश पाटील व नगरसेविका राजश्री धोत्रे यांनी घेतला आहे.अनेक दिवसापासून शहरातील खड्डे, स्वच्छता ,पिण्याचे पाणी या महत्वपूर्ण विषय प्रलंबित असताना लातूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना शहरातील खड्ड्यामुळे ना हरकत त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या खड्ड्यामुळे शहरातील काही नागरिकांनी आपला जीव गमावला असून. खड्ड्याच्या अपघातामुळे अनेक जण गंभीर जखमी झाली असून या महत्त्वपूर्ण विषयाकडे सत्ताधारी व मनपा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक गिरीश पाटील यांनी केला. तसेच शहरातील मोकाट श्वानाच्या विषयावर अनेक आंदोलन करून देखील एका युवकाला चावल्याने मृत्यू झाल्यानंतर मनपा प्रशासनाने पुन्हा हालचाली करून ही मोहीम अधिक वेगवान सुरू करण्याचा प्रयत्न केले. तसेच शहरातील स्वच्छतेचा विषय ऐरणीवर असून यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप देखील नगरसेवक गिरीश पाटील यांनी व्यक्त केला. या सर्व साधारण सभेचा अजेंडा हा आमदार अमित देशमुख यांच्या काढण्यात आल्याचा आरोप नगरसेवक गिरीश पाटील व नगरसेविका राजश्री धोत्रे यांनी नवराष्ट्र शी बातचीत करताना व्यक्त केला आहे.






