रोजच्या आहारात नियमित एक तरी फळ खावे, असा सल्ला कायमच दिला जातो. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. फळांमध्ये असलेली पोषक घटक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. बऱ्याचदा फळे खाल्ल्यानंतर त्यांच्या साली आणि बिया फेकून दिल्या जातात. पण याच बियांमध्ये शरीरास आवश्यक असलेले अनेक पोषक घटक आढळून येतात. फळांमध्ये असलेल्या बिया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासोबतच त्वचा आणि केसांसुद्धा फायदेशीर ठरतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या फळांच्या बिया शरीरासाठी फायदेशीर ठरतात. (फोटो सौजन्य – istock)
'या' फळांमधील बिया शरीरासाठी ठरतील वरदान, दैनंदिन आहारात सेवन केल्यास रक्तातील साखर राहील नियंत्रणात

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध असते. कलिंगडमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, मॅंगनीज, फोलेट आणि फॅटी ॲसिड्स शरीरासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय कलिंगडच्या बियांमध्ये आवश्यक पोषक घटक असतात.

अनेक घरांमध्ये खजूर बिया काढून सुकवल्या जातात. कडक सुकलेल्या बिया भाजल्यानंतर लहान मुलांपासून मोठेसुद्धा आवडीने खातात. या बियांमध्ये प्रथिने, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, पॉलीअनसॅचुरेटेड फॅट इत्यादी अनेक घटक आढळून येतात.

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात जांभळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानंतर त्याच्या आतील बिया फेकून देण्याऐवजी कडक सुकवून त्यांची पावडर करून घ्यावी. त्यानंतर पाण्यात मिक्स करून प्यायलस मधुमेह नियंत्रणात राहील.

कोकणात फणस मोठ्या प्रमाणात मिळतात. फणसाच्या आतील बियांचा वापर करून भाजी बनवली जाते. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि लोह इत्यादी अनेक घटक आढळून येतात.

दैनंदिन आहारात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डाळिंबाच्या बियांचे सेवन करावे. डाळिंब खाल्ल्यामुळे रक्ताची पातळी वाढण्यासोबतच रक्त स्वच्छ होण्यास मदत होते.






