भारतीय जेवणातील सर्वच पदार्थाना विशेष महत्व आहे. हे पदार्थ केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात अतिशय आवडीने खाल्ले जातात. त्यातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे रायता. बिर्याणी, पुलाव, पराठे किंवा मसालेदार भाजी बनवल्यानंतर अतिशय आवडीने रायता खाल्ला जातो. दही, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि इतर वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवला जाणारा चविष्ट रायता सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. चला तर जाणून घेऊया रायता हा शब्द नेमका आला कुठून आणि त्याबद्दलचा इतिहास. (फोटो सौजन्य – pinterest)
दह्याच्या पदार्थाला रायता नाव कोणी दिले? जाणून घ्या भारतीय खाद्यपरंपरेतील रायता शब्दामागील इतिहास

झुबिन डिसोझा या पुस्तकामध्ये रायत्याच्या नावामागील एक रंजक कथा सांगण्यात आली आहे. अनेकांच्या मते, रायता हा पदार्थ मुघलांनी आणला. भारतात दह्याच्या पदार्थांची परंपरा मुघल येण्याच्या आधीच अस्तित्वात आली होती.

दक्षिण भारतात पचडी हा पदार्थ अनेक वर्षांपासून बनवला जात आहे. मुघलांनी मसालेदार आणि तिखट पदार्थांसोबत जेवणाची चव वाढवण्यासाठी दह्यापासून अनेक पदार्थ बनवले. जेवणाचा वाढलेला तिखटपणा कमी करण्यासाठी दह्याचे सेवन केले जायचे.

रायता पदार्थ पुढे राजदरबारातून सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आणि भारतीय जेवणातील अतिशय महत्वाचा पदार्थ बनला आहे. रायता या शब्दाची मूळ भारतीय भाषांमध्ये सापडतात.

रायता हा पदार्थ केवळ चवीसाठीच नाहीतर जेवणाची चव वाढवण्यासाठी सुद्धा खाल्ला जातो. दही खाल्ल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि अतिमसालेदार पदार्थांच्या सेवांनंतर दह्याचे सेवन करावे.

दही, कांदा, टोमॅटो, मिरची आणि इतर भाज्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट रायता सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. बिर्याणी बनवल्यानंतर आवर्जून रायता खाल्ला जातो.






