'सुनेत्राताईंचे दु:ख खूप मोठे, पण त्यांनी...'; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
छत्रपती संभाजीनगर : तीन लाखांचा पंप २५ हजार रुपयांत देणार आहोत. शासकीय बांधकामांवर सोलर टॉप बसवणार असून, तशा योजना तयार केल्या आहेत. रस्ते विकासाची योजना, आरोग्य विभागाला सोलर माध्यमातून वीज देण्याचे नियोजन आहे. असे एकूण ७४ विषय आहेत, ज्यामधून ग्रामीण विकास होऊ शकतो. केंद्र आणि राज्य सरकार दोघांच्या माध्यमातून विकास केला जाईल. त्यातून आम्ही संकल्पनामा जाहीर करणार आहोत.
विरोधक हरले म्हणून आरोप करत आहेत. ज्या ठिकाणी ते जिंकले, त्या ठिकाणी काय म्हणणार? आम्हीही अनेक वेळा हरलो. मात्र, त्यातून शिकलो आणि पुढे गेलो. काही ठिकाणी आम्ही सोबत आहोत, तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहोत. निवडणुकीनंतर त्यावर चर्चा करू. मनभेद होणार नाहीत, याकडे लक्ष देऊ. आरोप-प्रत्यारोप करून प्रचार करणार नाही. कोणाच्या विरोधात आम्ही बोललो नाही. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. आम्ही जाणार आहोत.
दरम्यान, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. मुख्यमंत्री जाणार नाहीत, मात्र ‘तुम्ही निर्णय घ्या’ असे त्यांनी सांगितले. मंत्री म्हणून आम्ही जाणार आहोत. तो त्यांचा पक्ष आहे, त्यांचे कार्यकर्ते त्यांना सांभाळायचे आहेत.
सुनेत्राताईंचे दु:ख खूप मोठे, पण त्यांनी…
14 कोटी जनतेच्या दृष्टीने हे मोठे दुःख आहे. सुनेत्रा ताई यांचे दुःख खूप मोठे आहे. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी निर्णय घेतला आहे. त्या कर्तव्यपथावर जात आहेत. अजित दादांचा जो संकल्प आहे, तो जिवंत ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला.
शपथविधीबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचा
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यांनी जसे सांगितले, तसे केले. त्यांनी प्रस्ताव दिला, त्यात आम्ही कोणतीही ढवळाढवळ केली नाही. नेतेपदावर त्यांची घोषणा झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला. त्यात आमचा काहीही सहभाग नाही. विकसित महाराष्ट्रासाठी छातीवर दगड ठेवून पक्षाने निर्णय घेतला आहे. पक्षाने निर्णय घेतल्यानंतर, मनात असो वा नसो, त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
शिखर बँक घोटाळ्याचा विषय महत्त्वाचा आहे की…
“माणुसकी हरली, खुर्ची जिंकली” असे म्हणणे चुकीचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा मान त्यांनी ठेवला आहे. अशा दुःखातही त्यांना सामना पेपर चालवायचा आहे. शिखर बँक घोटाळ्याचा विषय महत्त्वाचा आहे की राज्य महत्त्वाचे आहे, हे पाहावे. निवडणुकीत निर्णयाची चिंता करायची नसते.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: “प्रसंग कठीण होता, पण…”; सुनेत्रा पवार DCM होताच फडणवीसांची पोस्ट व्हायरल






